शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

झटपट यशासाठी खेळाडू ड्रग्ज घेतात, ते योग्य नाही- मिल्खा सिंग

By admin | Updated: May 8, 2016 22:35 IST

एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 8- रोम आॅलिंपिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार फ्लार्इंग सिख मिल्खा सिंग यांनी काढले.कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.खेळाडूंना सल्ला देताना ते म्हणाले, की आमच्या पिढीने, तसेच पी. टी. उषा, अंजू जॉर्ज अशा खेळाडूंनी खूप मेहनत केली. आजच्या पिढीला मात्र झटपट यश हवे आहे आणि म्हणून अनेक जण ड्रग्ज घेतात, हे योग्य नाही. यामुळे अनेक स्पर्धांत आपली पदके काढून घेतली गेली. देशाची नाचक्की झाली. तरुण खेळाडूंनी ड्रग्जचा नव्हे, मेहनतीचा पर्याय निवडावा. पैशासाठी मॅच-फिक्सिंगही करू नये. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशप्रेमाचा सल्ला दिला. जेथे जाल तेथे देशाचा लौकिक उंचावणारी कामगिरी करा. आपण फार मोठ्या संघर्षानंतर देश स्वतंत्र केला आहे. देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.मिल्खा यांच्या हस्ते रिओ आॅलिंपिकला पात्र ठरलेला मल्ल नरसिंग यादव, रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह ईशा करवडे, तेजस्विनी मुळे, बालकल्याण संस्थेची गौरी गाडगीळ, वैष्णवी जगताप, पॅरा खेळाडू माधवी लता, भरत चव्हाण, बालकल्याणचे प्रशिक्षक अभिजित तांबे, अशोक नांगरे, गजानन पाटील, प्रवीण ढगे, राजेंद्र सापटे, धीरज मिश्रा, दीपाली निकम, बीईजीचे जगन्नाथ लकडे, सी. प्रकाश, सागर ठाकूर, अँथनी दास परेरा, तसेच राजू दाभाडे, राहुल राणे यांचा सत्कार करण्यात आला.नरसिंगने सांगितले, की रिओ आॅलिंपिकसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच एकमेव ध्येय आहे. दत्तू म्हणाला, की आॅलिंपिक म्हणून वेगळी स्पर्धा असा माझा दृष्टिकोन नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करायची हाच निर्धार आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आपल्या देशाचे अनेक खेळाडू कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची नसताना आणि उलट ती प्रतिकूल असताना यश मिळवित आहेत. अशा पराक्रमी खेळाडूंचा प्रातिनिधीक सत्कार करणे हा पीआयएसईचा बहुमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)