शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:41 IST

विक्रोळीतील वर्षानगरमधील नागरिक त्रस्त : १५ मिनिटांच्या पाण्यासाठी १०० रूपये

मुंबई : अवघ्या १५ मिनिटाच्या पाण्यासाठी १०० रुपये मोजायचे. आणि पाण्याच्या प्रतीक्षेत रात्र काढायची. पाण्याने भरलेले हंडे, बादल्या कडेवर घेत निसरड्या वाटेतून घर गाठायचा. पाण्यासाठीचा असा जीवघेणा खेळ विक्रोळीच्या वर्षानगर परिसरात सुरु आहे.विक्रोळी पश्चिमेकडील सुर्यानगर, शिवाजी नगर, रायगड झोन वर्षा नगर परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहेत. यात, डोंगरात वसलेल्या वर्षा नगर परिसरात ८ ते १० हजार रहिवासी पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. या परिसरात पाण्याची टाकी उभारली. मात्र याची देखरेख खासगी मंडळाकडून होते. त्यात येथील रहिवाशांनाकडून १५ मिनिटाच्या पाण्यासाठी महिनाकाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे.

सायंकाळी साडे सात वाजल्यापासून येथील विविध प्रभागांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यातही टेकडीवर असलेल्यांना पाण्यासाठी तळाशी असलेल्या नळावर रांगा लावाव्या लागतात. ३० मिनिटाची वेळ असली तरी, फक्त १५ ते २० मिनिटे पाणी रहिवाशांच्या नशीबी पडते. ते घेण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यामुळे अनेकदा ’कोणी पाणी देत का पाणी म्हणत’ ही मंडळी पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या नळाकडील रहिवांशाकडे विनवणी करताना दिसतात. एका नळावर अनेकदा १५ ते २० कुटुंब रांग लावून असतात.अशात, अनधिकतपणे नळजोडणी वाढल्याने, येथील पाण्याचा दबाव आणखीन कमी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावर पाणी सांडल्याने रस्ताही निसरडा होतो. त्यामुळे अपघाताच्याही छोट्या मोठ्या घटना येथील रहिवाशांसाठी नवीन नाही.पाण्यासाठीच मरण...पाण्यासाठीची वेळ ठरलेली. त्यातही कमी दाबामुळे एक हंडा भरण्यासाठी ४ ते ५ मिनिटे लागतात. त्यात, एका नळावर दोन कुटुंबे अवलंबून असली तरी, वरच्या रहिवाशांचीही त्याच ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे आमच मरण हे नेहमीच बनले आहे. अशा अवस्थेत कोणीही मदतीला फिरकत नाही. नुकताच याच समस्येमुळे दुसरीकडे भाड्याने राहतो आहे.- मनोज पांडे, स्थानिक रहिवासीकमी वेळ, त्यात कमी दाब यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च कनेक्शन मिळते. कनेक्शन मिळाले की सुरुवातीचे १५ दिवस पाणी येणार व्यवस्थित, मात्र नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. त्यात, अनधिकत पाणी धारकांना ७० ते ७५ हजार रुपयांत जोडणी मिळते. जे अधिकत आहेत. त्यांच्याच नळाच्या पाईपमध्ये टब मारुन त्यांना पाणी दिले जाते.- रवी तिवारी, शिवाजी नगर रहिवासीमुंबईसारख्या ठिकाणी पाण्यासाठी अशी जीवघेणी अवस्था होते याच दुख आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुनील विश्वकर्मा, वर्षानगर रहिवासीआजही रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या प्रकाशात पाण्याच्या बादल्या, हंड्या घेवून चढउतार करत आहोत. आधीच कमी वेळ त्यात, दबावही कमी झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- ज्ञानेश्वर अण्णा बोलकडे, वर्षानगर रहिवासी