शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टीकमुक्ती दिखाव्यापुरतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 03:05 IST

पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहरात रोज तब्बल ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकचा वापर सर्रास सुरू असून मॉलपासून दुकानदारांपर्यंत शुल्क न आकारता प्लास्टीक पिशव्या दिल्या जात आहेत. प्लास्टीकमुक्तीचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये चांगले काम सुरू असल्याचा दिखावा करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला पण एकही ठिकाण फेरीवालामुक्त करता आलेले नाही. ८ हजार अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या पण सर्वच्या सर्व पुन्हा सुरू झाल्या. ओला व सुका कचरा, पाण्याचा अपव्यय थांबविण्याचे अभियानही फसले आहेत. कायमस्वरूपी यंत्रणा बसविण्यापेक्षा दिखावेगिरीचे काम सुरू झाले असून त्यामध्ये आता प्लास्टीकमुक्त नवी मुंबई अभियानाची भर पडली आहे. पालिकेने ८ जानेवारीला शंकर महादेवन, जुही चावला व अनेक चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीमध्ये प्लास्टीकमुक्त अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी, सामाजिक संस्थांच्या मदतीने २४ मेट्रिक टन प्लास्टीक गोळा केले. गोळा केलेले प्लास्टीक तुर्भे डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आले. तेथे डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे बनविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. पण प्रत्यक्षात प्लास्टीक दाणे बनविण्याचा प्रकल्प पालिकेकडे नाही. प्लास्टीकचा पुनर्वापर करण्याची काहीच यंत्रणा नाही. यामुळे जमा झालेल्या कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या कारखान्याला विकण्यात आला आहे. उरलेला कचरा क्षेपणभूमीवरच पडला आहे. यामुळे डांबरीकरणासाठी प्लास्टीक दाणे बनविण्याची घोषणा खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने राबविलेल्या एक दिवसीय अभियानामध्ये २४ टन प्लास्टीक कचरा जमा झाला होता. वास्तविक शहरामध्ये रोज ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. यामुळे पालिकेने विशेष अभियान राबवूनही सर्व कचरा संकलित करता आलेला नाही. एक दिवसाचे अभियान झाल्यानंतर पुन्हा प्लास्टीक संकलित कसे करायचे याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. शहरात अनेक ठिकाणी प्लास्टीकमुक्तीचे फलक लावले आहेत. पण नियम धाब्यावर बसवून कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मॉल व इतर दुकानदारांनीही प्लास्टीक पिशव्या मोफत देणे बंद करणे आवश्यक आहे. एकूणच प्लास्टीकला पर्यायी पिशव्या उपलब्ध नसल्याने हे अभियान फसले आहे. विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष प्लास्टीकचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके वगळता एकही विभाग अधिकारी प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत नाही. तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील एपीएमसी मार्केट, मॅफ्को, तुर्भे जनता मार्केट, तुर्भे नाका परिसरात नवी मुंबईतील सर्वात जास्त प्रतिबंधात्मक प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असून तेथील विभाग अधिकारी अंगाई साळुंखे कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जो पर्यंत नियमीतपणे कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत प्लास्टीक मुक्ती शक्य नसल्याचे बोलले जात आहे. >प्लास्टीक दाण्याची फक्त घोषणाप्लास्टीकमुक्त अभियान राबविताना जमा होणाऱ्या कचऱ्यापासून डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे तयार केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात अशाप्रकारे प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प महापालिकेच्या क्षेपणभूमीवर नाही. यामुळे जमा झालेला कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नवीन सुरू होत असलेल्या कारखान्याला विकला आहे. पालिकेची ही योजनाही घोषणाबाजीच ठरली आहे. >प्लास्टीकमुक्तीसाठी हव्यात या उपाययोजना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर हवी रोज कारवाई मोफत प्लास्टीक पिशवी देणाऱ्या व्यावसायिकांवर हवी कारवाई कमी जाडीच्या पिशव्या विकणाऱ्या होलसेल दुकानांवर कारवाईची गरज शहरातील प्लास्टीकचा कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा हवीप्लास्टीक पिशव्यांना पर्यायी कागदी व इतर पिशव्यांची उपलब्धता आवश्यक व्यापाऱ्यांची बैठक घेवून त्यांना प्लास्टीकमुक्तीसाठी आवाहन करावेनागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून प्लास्टीक कमीत कमी वापरावे