शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी लागू, कारखान्यांवर छापे टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:32 IST

राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे. बंदी हटविण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला आहे. बंदीच्या व्यवस्थित व परिणामकारक अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक कारखान्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिका-यांना दिले.राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा आदेश काढला होता. त्यास प्लॅस्टिक उत्पादक व वितरकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारी सुनावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर, पर्यावरणमंत्री कदम यांनी बैठक घेतली. त्याला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्या वेळी कदम म्हणाले की, जमा होणारे प्लॅस्टिक व त्यावरील ‘रिसायकलिंग’चा अहवाल आठ दिवसांत सादर करावा. पर्यटन व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना व ग्राहकांना प्लॅस्टिकच्याच पिशव्या दिल्या जातात, ते थांबवावे. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन व साठा करणाºयांवर आणि दुकानदारांवर कारवाई करून, साठा जप्त करण्यात यावा.>थर्माकोलला गणेशोत्सवात सूट?गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर वापरण्यास काहींनी परवानगी मागितली आहे. विकलेले मखर परत घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे हमीपत्र दिल्यास गणेशोत्सवासाठी थर्माकोलबंदी हटविण्याबाबत निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे.>मोदींवर टीका; तयारी करून निर्णयकेंद्र सरकारच्या नोटाबंदीप्रमाणे प्लास्टिकचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. नऊ महिन्यांपासून त्याची तयारी व अभ्यास सुरू होता. त्यामुळे लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली आहे. नियम न पाळणारी मंडळीच दंडाच्या रकमेची चिंता करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन करणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल करून ते सील करा. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण समिती आहे. तिने बंदीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घ्यावा.- रामदास कदम, पर्यावरण मंत्री>असा होईल दंडपहिल्यांदानियम मोडणे 5,000दुस-यांदानियम मोडणे 10,000तिस-यांदानियम मोडणे 25,000 व ३ महिन्यांचा होणार तुरूंगवास> कोणालाही दंडात सूट मिळणार नाहीबंदी असलेले 80%प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. ते आणणाºयास तीन महिन्यांची शिक्षा होईल. 1200टन प्लॅस्टिक कचरा रोज राज्यात तयार होतो. 17 राज्यांनी आतापर्यंत प्लास्टिक बंदी केली आहे. महाराष्ट्र अठरावे राज्य आहे.