शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी लागू, कारखान्यांवर छापे टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:32 IST

राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत शुक्रवारी तहकूब केल्याने, राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू झाली आहे. बंदी हटविण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला आहे. बंदीच्या व्यवस्थित व परिणामकारक अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक कारखान्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिका-यांना दिले.राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा आदेश काढला होता. त्यास प्लॅस्टिक उत्पादक व वितरकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारी सुनावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर, पर्यावरणमंत्री कदम यांनी बैठक घेतली. त्याला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्या वेळी कदम म्हणाले की, जमा होणारे प्लॅस्टिक व त्यावरील ‘रिसायकलिंग’चा अहवाल आठ दिवसांत सादर करावा. पर्यटन व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना व ग्राहकांना प्लॅस्टिकच्याच पिशव्या दिल्या जातात, ते थांबवावे. प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन व साठा करणाºयांवर आणि दुकानदारांवर कारवाई करून, साठा जप्त करण्यात यावा.>थर्माकोलला गणेशोत्सवात सूट?गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर वापरण्यास काहींनी परवानगी मागितली आहे. विकलेले मखर परत घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे हमीपत्र दिल्यास गणेशोत्सवासाठी थर्माकोलबंदी हटविण्याबाबत निर्णय घेण्याचा सरकारचा विचार आहे.>मोदींवर टीका; तयारी करून निर्णयकेंद्र सरकारच्या नोटाबंदीप्रमाणे प्लास्टिकचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. नऊ महिन्यांपासून त्याची तयारी व अभ्यास सुरू होता. त्यामुळे लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली आहे. नियम न पाळणारी मंडळीच दंडाच्या रकमेची चिंता करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन करणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल करून ते सील करा. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण समिती आहे. तिने बंदीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आढावा घ्यावा.- रामदास कदम, पर्यावरण मंत्री>असा होईल दंडपहिल्यांदानियम मोडणे 5,000दुस-यांदानियम मोडणे 10,000तिस-यांदानियम मोडणे 25,000 व ३ महिन्यांचा होणार तुरूंगवास> कोणालाही दंडात सूट मिळणार नाहीबंदी असलेले 80%प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. ते आणणाºयास तीन महिन्यांची शिक्षा होईल. 1200टन प्लॅस्टिक कचरा रोज राज्यात तयार होतो. 17 राज्यांनी आतापर्यंत प्लास्टिक बंदी केली आहे. महाराष्ट्र अठरावे राज्य आहे.