शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खडकाळ जमिनीवर फुलविली डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:57 IST

यशकथा : युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.

- आत्माराम गायकवाड (पाचोरा) 

वाडीशेवाळे (जि. जळगाव)  येथील युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे. यात त्यांनी ८२० रोपांची लागवड केली आहे. पाटील यांनी मे २०११ मध्ये ही लागवड केली. त्यांच्या बागेतील डाळिंबाला नाशिक व कोलकाता येथील मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. 

इतर व्यवसायापेक्षा पाटील यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून विविध प्रयोग केल्याने यावर्षी त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. डाळिंबाची लागवड १०.१४ फूट अंतरावर केली असून, या बागेला ठिबक सिंचन संच, तसेच फवारणी यंत्र बसविले आहेत. डाळिंब बागेच्या लागवडीनंतर पाणीटंचाई, नैसर्गिक संकटे, तसेच तेल्यासारख्या रोगाच्या आक्रमणानंतरसुद्धा त्यांनी मोठ्या संयमाने बागेची निगा राखली आहे. कुठलीही तांत्रिक माहिती नसताना या पिकाबाबतची सर्व शास्त्रोक्त माहिती मिळवून त्यांनी बागेचे चांगले संगोपन केले आहे. 

बागेचे खत व पाणीव्यवस्थापनडाळिंब बागेत आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन, बहरव्यवस्थापन, तसेच फळाची काढणी व विक्री याचे व्यवस्थापन ते करीत असतात. यावर्षी कडक उन्हापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी बागेवर सफेद नेटचे आच्छादन केले होते. त्यामुळे फळांचा उन्हापासून बचाव झाला, तसेच पाणी बचतीसाठी बागेतीलच गवत व काडीकचरा यांचा वापर करून नैसर्गिक आच्छादन केले होते. परिणामी, दुष्काळी परिस्थिती असतानादेखील त्यांच्या बागेत उत्कृष्ट फळे लगडली. डाळिंब हे पीक तसे खर्चिक व जोखमीचे पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी सध्या डाळिंबाचे दर घसरलेले असताना सुनील पाटील यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट दर्जामुळे व्यापारी वर्गाकडून मोठी मागणी आहे.

यावर्षी बागेतून १० टन डाळिंबाची विक्री झाली आहे. पुढील वर्षी युरोपच्या बाजारात डाळिंबाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील हे डाळिंब पिकासोबतच भाजीपाल्यातील टोमॅटो, कारली, गंगाफळ, मिरची या पिकांची उत्कृष्ट शेती करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे. 

सुनील पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित खडकाळ शेतीत त्यांनी नंदनवन फुलविले आहे. त्यांचा खर्च अडीच लाखांपर्यंत झाला आहे. खर्च वजा जाता त्यांना सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. डाळिंब उत्पादक सुनील पाटील यांनी यानिमित्ताने लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. शेतकऱ्यांनी केवळ नापिकीला दोष देत कपाळावर हात न मारता अधिक जोमाने कार्य केल्यास शेती निश्चितच फायद्याची आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी