शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळ जमिनीवर फुलविली डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:57 IST

यशकथा : युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.

- आत्माराम गायकवाड (पाचोरा) 

वाडीशेवाळे (जि. जळगाव)  येथील युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे. यात त्यांनी ८२० रोपांची लागवड केली आहे. पाटील यांनी मे २०११ मध्ये ही लागवड केली. त्यांच्या बागेतील डाळिंबाला नाशिक व कोलकाता येथील मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. 

इतर व्यवसायापेक्षा पाटील यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून विविध प्रयोग केल्याने यावर्षी त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. डाळिंबाची लागवड १०.१४ फूट अंतरावर केली असून, या बागेला ठिबक सिंचन संच, तसेच फवारणी यंत्र बसविले आहेत. डाळिंब बागेच्या लागवडीनंतर पाणीटंचाई, नैसर्गिक संकटे, तसेच तेल्यासारख्या रोगाच्या आक्रमणानंतरसुद्धा त्यांनी मोठ्या संयमाने बागेची निगा राखली आहे. कुठलीही तांत्रिक माहिती नसताना या पिकाबाबतची सर्व शास्त्रोक्त माहिती मिळवून त्यांनी बागेचे चांगले संगोपन केले आहे. 

बागेचे खत व पाणीव्यवस्थापनडाळिंब बागेत आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन, बहरव्यवस्थापन, तसेच फळाची काढणी व विक्री याचे व्यवस्थापन ते करीत असतात. यावर्षी कडक उन्हापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी बागेवर सफेद नेटचे आच्छादन केले होते. त्यामुळे फळांचा उन्हापासून बचाव झाला, तसेच पाणी बचतीसाठी बागेतीलच गवत व काडीकचरा यांचा वापर करून नैसर्गिक आच्छादन केले होते. परिणामी, दुष्काळी परिस्थिती असतानादेखील त्यांच्या बागेत उत्कृष्ट फळे लगडली. डाळिंब हे पीक तसे खर्चिक व जोखमीचे पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी सध्या डाळिंबाचे दर घसरलेले असताना सुनील पाटील यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट दर्जामुळे व्यापारी वर्गाकडून मोठी मागणी आहे.

यावर्षी बागेतून १० टन डाळिंबाची विक्री झाली आहे. पुढील वर्षी युरोपच्या बाजारात डाळिंबाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील हे डाळिंब पिकासोबतच भाजीपाल्यातील टोमॅटो, कारली, गंगाफळ, मिरची या पिकांची उत्कृष्ट शेती करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे. 

सुनील पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित खडकाळ शेतीत त्यांनी नंदनवन फुलविले आहे. त्यांचा खर्च अडीच लाखांपर्यंत झाला आहे. खर्च वजा जाता त्यांना सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. डाळिंब उत्पादक सुनील पाटील यांनी यानिमित्ताने लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. शेतकऱ्यांनी केवळ नापिकीला दोष देत कपाळावर हात न मारता अधिक जोमाने कार्य केल्यास शेती निश्चितच फायद्याची आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी