शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावा चैतन्य फुलवा, पर्यावरणाचे संवर्धन करा

By admin | Updated: July 22, 2016 02:27 IST

धावपळीच्या आणि यंत्राच्या चाकाप्रमाणे फिरणाऱ्या आजच्या या विज्ञान युगात माणूस अनेक जबाबदाऱ्या पाठीशी घेऊन काम करत आहे.

धावपळीच्या आणि यंत्राच्या चाकाप्रमाणे फिरणाऱ्या आजच्या या विज्ञान युगात माणूस अनेक जबाबदाऱ्या पाठीशी घेऊन काम करत आहे. आपले काम आणि आपण एवढेच तो समजतो. मग त्याचे पर्यावरणाकडे लक्ष जाणार तरी कसे? निसर्गसौंदर्य पाहायला त्याला वेळच नाही. तो निसर्गाशी मैत्री साधत नाही, निसर्गाशी एकरुप होत नाही. निसर्गाशी एकरुप न झाल्याने नैसर्गिक विविधता, नाविन्य माणसाला उपभोगता येईल का? चैतन्य, प्रसन्नता यांचे सुख त्याला मिळेल का? नाही. कारण आजच्या धावपळीच्या युगात मानवाने निसर्गाला पाठ दाखवली आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करुन आपल्या घातक कृतीतून मानवाने पर्यावरणाचा समतोल ढासळवला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. दररोज अनेक मार्गांनी होणाऱ्या प्रदूषणाचा सभोवतालच्या निसर्गावर, पर्यावरणावर, जनजीवनावर होणारा परिणाम फारच भयंकर आहे. निसर्ग माणसाला चैतन्य देतो. आनंद, शांती, उत्साह व चैतन्य मिळविण्यासाठी माणसे निसर्गात रमतात. कंटाळा, दिवसभराचा शीण, आळस घालविण्यासाठी माणसे एखाद्या बागेत जातात. तेथील झाडं, फुलं त्या फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरं, त्यांची रंगबिरंगी रुपे ते आपल्या नयनात टिपून घेतात. मग त्यांना आनंद मिळतो तो निसर्गाशी एकरुप झाल्याचा. प्रसन्नता आणि शांती लाभून त्यांचे मन उत्साही बनते. वातावरण स्वच्छ, शांत ठेवायचे असेल आणि चैतन्य फुलवायचे असेल तर मग पर्याय एकच ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. हे सांगण्याचे कारण एकच की, मनुष्य आळशी बनत चालला आहे. त्याने झाडे तोडली पण नवी झाडे लावली नाहीत. काही माणसे फक्त झाडाचे फळ चाखतात, पण झाडे लावत नाहीत की त्यांना पाणी घालत नाहीत. अंगणात असलेले झाड त्यांच्या कामासाठी पाहिजे असेल किंवा त्याची अडचण होत असेल तर ते झाड माणसे तोडतील पण दुसरे झाड लावणार नाहीत. इंधन टंचाईत मनुष्याने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. पण नवी झाडे लावली नाहीत. जंगल तोडीमुळे सृष्टीचे रुप बदलू लागले. हिरवाईचे प्रदेश ओसाड पडू लागले. नवी झाडे न लावल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले. प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. सृष्टीसौंदर्य हरपू लागले. शांतता व प्रसन्नता भंग पावली. मग जंगल संपत्ती नष्ट होऊ लागल्याने जंगलतोडीविषयक कायदे केले गेले, वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. झाडाफुलांजवळ मनुष्याला जे मिळते ते त्याचे जीवन. म्हणजेच त्याचा आनंद. मित्रांनो हिरव्यागार मखमलीवर पडून झाडांसंगे गप्पा मारुन फुलपाखरांसमवेत बागडून पहा किती मौज आहे. हा सुखद अनुभव अनुभवा. निसर्गात रमा, झाडे लावा त्यांची योग्य काळजी घ्या. झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल. - अभिजीत शशिकांत पिसे. अक्षरशिल्प, खेंड चिपळूण >सृष्टीसौंदर्यात दंग झाल्याने माणसाला नवचैतन्य मिळते. माणूस जर आनंदी असेल, उत्साह व चैतन्य त्याच्याकडे असेल तर तो खऱ्या अर्थाने जीवन जगेल. ज्याचा आनंद शुध्द, त्याचे जीवन शुध्द. हा आनंद लाभणार या सृष्टीत, निसर्गाच्या सान्निध्यात, झाडाफुलांच्या सहवासात. म्हणूनच ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. सृष्टीसौंदर्य वाढवा, झाडे लावून सृष्टीचे रुप हिरवेगार ठेवा. ‘झाडे लावा झाडे लावा, झाडे जगवा चैतन्य फुलवाझाडे लावा प्रदूषण टाळा, आरोग्य टिकवा, जीवन फुलवा’