शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

नोटाबंदीच्या निर्णयाअगोदर नियोजन आवश्यक होते - अजित पवार

By admin | Updated: November 17, 2016 01:51 IST

नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

भवानीनगर : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णयामुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. काळ्या पैशाला आळा बसावा, या मागणीला पाठिंबा आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी या सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सणसर येथे आयोजित खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे होते. पवार म्हणाले, की केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतल्यामुले सध्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी योग्य नियोजनाची आवश्यकता होती. मजूर वर्गाचे तर खूप हाल होत आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात करूनदेखील सुट्टे पैसे मिळत नाहीत. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. खाद्यपदार्थांपासून देखील सुट्या पैशांअभावी दूर राहावे लागत आहे. गुंजवणीचे पाणी इंदापूर, बारामतीला मिळण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह आपणदेखील प्रयत्नशील आहोत. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांचे भाषण झाले. या वेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, तुकाराम काळे, प्रताप पाटील, प्रदीप निंबाळकर, रणजित निंबाळकर उपस्थित होते. (वार्ताहर)