शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

जिल्ह्यात ११ पाणीपुरवठा योजनांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:35 IST

उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’मधून रायगड जिल्ह्याकरिता एकूण ११ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण १८ कोटी रुपये खर्चाच्या नऊ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनास सादर करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.बी.हेजरे यांनी दिली आहे.पूर्वी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अस्तित्वात होता. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत होता. या पाणीपुरवठा योजनांसाठी राज्यांना केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागत होते. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी येणारा निधी बंद केला. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य शासनापुढे अडचणी येवू लागल्या. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल २०१६ मध्ये राज्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी राज्याची ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मे २०१६ मध्ये राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ जाहीर केला आहे. परिणामी आता ग्रामीण पाणीपुरवठा विशेषत: उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यात यश येवू शकणार आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात या ११ योजना राबविण्यात येणार आहेत. उरण तालुक्यातील रानसई आणि पनवेल तालुक्यातील आदई या दोन पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करण्याचे बाकी आहे. लवकरच ते पूर्ण होतील. उर्वरित१८ कोटी १९ लाख एवढ्या निधीचे नऊ प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविले आहेत. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, राज्यात ग्रामीण भागातील गाव, वाड्या, वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पुरवठा योजनांची देखभाल दुरु स्ती अशी कामे करण्यात येणार आहेत.>अलिबागमध्ये पाच योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत रायगडमध्ये होत असलेल्या नवीन नऊ पाणीपुरवठा योजनांपैकी अलिबाग तालुक्यात पाच योजना आहेत. नागाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी २३ लाख, कुर्डूस हद्दीतील रु ईशेत-भोमोली १ कोटी ९ लाख, नवेदर नवगाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ८१ लाख, कुसुंबळे येथील हेमनगरसाठी १ कोटी १३ लाख या पाच योजनांचा समावेश आहे. उर्वरित चारमध्ये पनवेल तालुक्यातील सावलेसाठी १ कोटी ८७ लाख, माणगाव येथील कावील-वहाळसाठी १ कोटी २८ लाख, उरण येथील कोप्रोलीसाठी १ कोटी ३७ लाख, रोहा तालुक्यातील वरसेसाठी ३ कोटी ६१ लाख असा एकूण १८ कोटी १९ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. >उन्हाळ्यासाठी नियोजनराज्य शासनाकडूून लवकरच या सर्व योजनांना मंजुरी मिळेल आणि पुढील सुमारे दीड ते दोन महिन्यात या योजनांचे काम पूर्ण होईल असे नियोजन असल्याने यंदाच्या उन्हाळ््यात या योजनांच्या क्षेत्रांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचा आहे.