शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यात ११ पाणीपुरवठा योजनांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:35 IST

उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’मधून रायगड जिल्ह्याकरिता एकूण ११ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण १८ कोटी रुपये खर्चाच्या नऊ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनास सादर करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.बी.हेजरे यांनी दिली आहे.पूर्वी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अस्तित्वात होता. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत होता. या पाणीपुरवठा योजनांसाठी राज्यांना केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागत होते. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी येणारा निधी बंद केला. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य शासनापुढे अडचणी येवू लागल्या. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल २०१६ मध्ये राज्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी राज्याची ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मे २०१६ मध्ये राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ जाहीर केला आहे. परिणामी आता ग्रामीण पाणीपुरवठा विशेषत: उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यात यश येवू शकणार आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात या ११ योजना राबविण्यात येणार आहेत. उरण तालुक्यातील रानसई आणि पनवेल तालुक्यातील आदई या दोन पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करण्याचे बाकी आहे. लवकरच ते पूर्ण होतील. उर्वरित१८ कोटी १९ लाख एवढ्या निधीचे नऊ प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविले आहेत. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, राज्यात ग्रामीण भागातील गाव, वाड्या, वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पुरवठा योजनांची देखभाल दुरु स्ती अशी कामे करण्यात येणार आहेत.>अलिबागमध्ये पाच योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत रायगडमध्ये होत असलेल्या नवीन नऊ पाणीपुरवठा योजनांपैकी अलिबाग तालुक्यात पाच योजना आहेत. नागाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी २३ लाख, कुर्डूस हद्दीतील रु ईशेत-भोमोली १ कोटी ९ लाख, नवेदर नवगाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ८१ लाख, कुसुंबळे येथील हेमनगरसाठी १ कोटी १३ लाख या पाच योजनांचा समावेश आहे. उर्वरित चारमध्ये पनवेल तालुक्यातील सावलेसाठी १ कोटी ८७ लाख, माणगाव येथील कावील-वहाळसाठी १ कोटी २८ लाख, उरण येथील कोप्रोलीसाठी १ कोटी ३७ लाख, रोहा तालुक्यातील वरसेसाठी ३ कोटी ६१ लाख असा एकूण १८ कोटी १९ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. >उन्हाळ्यासाठी नियोजनराज्य शासनाकडूून लवकरच या सर्व योजनांना मंजुरी मिळेल आणि पुढील सुमारे दीड ते दोन महिन्यात या योजनांचे काम पूर्ण होईल असे नियोजन असल्याने यंदाच्या उन्हाळ््यात या योजनांच्या क्षेत्रांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचा आहे.