शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

चौपदरीकरणाचा आराखडा आघाडी सरकारचाच

By admin | Updated: June 1, 2015 00:17 IST

अतुल काळसेकर : आमदार नीतेश राणे यांच्यावर केली टीका

कणकवली : माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्प राबवण्यासाठी वेळप्रसंगी विरोधकांना हद्दपार करण्याची भाषा केली. त्यांचेच सुपुत्र आमदार नीतेश राणे हे चौपदरीकरणाच्या विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. चौपदरीकरणाचा आराखडा कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातच बनला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. यावेळी तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर उपस्थित होते.काळसेकर म्हणाले की, आमदार नीतेश राणे ज्या आराखड्याच्या विरोधात बोलत आहेत आणि त्याविरोधात ग्रामस्थांना भडकावत आहेत, तो चौपदरीकरणाचा आराखडा हा कॉँग्रेसच्या सत्ताकाळातच बनला आहे. २०१० साली महामार्गाचा आराखडा बनविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. तसेच नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०११ साली केंद्रात कॉँग्रेस सरकार असताना हा आराखडा मंजूर झाला. आमदार राणेंची सध्याची आंदोलनाची भूमिका म्हणजे ‘मांजर मारून काशीला जाऊन पाप धुवून येण्यासारखी’ आहे, अशी टीका काळसेकर यांनी यावेळी व्यक्त केली.नीतेश राणे यांचे वक्तव्य पूर्णत: चुकीचे व अभ्यासहीन आहे. गौण खनिज बंदीचा मोर्चा असतो की रेल रोको आंदोलन असो राणे कुटुंबीयांना सत्तेत असताना व विरोधी पक्षात असताना जनतेचे प्रश्न आंदोलन करून कसे सोडवायचे हे समजलेच नाही, असे ते म्हणाले. कॉँग्रेसच्या सत्ताकाळात बनलेल्या आराखड्यात बदल करण्याचे अधिकारी केंद्राचे आहेत. लोकांना भावना भडकावण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही. कणकवली, कुडाळ तालुक्यात भाजपा पदाधिकारी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामस्थांकडून हरकती घेऊन आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही काळसेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.नारायण राणे यांनी विकासाला विरोध करू नका, अशी भूमिका घेतली. आमदार नीतेश राणेंना ही भूमिका मान्य नाही का? चौपदरीकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेने हा आराखडा कोणाची हॉटेल्स, संस्था भवने वाचवण्यासाठी करण्यात आला आहे, हे लक्षात घ्यावे. (प्रतिनिधी)कॉँग्रेसने केलेल्या या आराखड्यात बदल सुचवायचे असतील, तर ते केंद्रशासनाकडे सुचवावे लागतील. यासाठी या प्रश्नाचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात संबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.चौपदरीकरणाच्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या ज्या सूचना, हरकती असतील, त्यांनी त्या २ जूनपर्यंत द्यायच्या आहेत, असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.नीतेश यांच्याकडून ग्रामस्थांना भडकावण्याचे काम.२०१०सालीच महामार्गाचा आराखडा बनवण्याचे काम होते सुरू; काळसेकर.