शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

चौपदरीकरणाचा आराखडा आघाडी सरकारचाच

By admin | Updated: June 1, 2015 00:17 IST

अतुल काळसेकर : आमदार नीतेश राणे यांच्यावर केली टीका

कणकवली : माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्प राबवण्यासाठी वेळप्रसंगी विरोधकांना हद्दपार करण्याची भाषा केली. त्यांचेच सुपुत्र आमदार नीतेश राणे हे चौपदरीकरणाच्या विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. चौपदरीकरणाचा आराखडा कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातच बनला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. यावेळी तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर उपस्थित होते.काळसेकर म्हणाले की, आमदार नीतेश राणे ज्या आराखड्याच्या विरोधात बोलत आहेत आणि त्याविरोधात ग्रामस्थांना भडकावत आहेत, तो चौपदरीकरणाचा आराखडा हा कॉँग्रेसच्या सत्ताकाळातच बनला आहे. २०१० साली महामार्गाचा आराखडा बनविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. तसेच नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०११ साली केंद्रात कॉँग्रेस सरकार असताना हा आराखडा मंजूर झाला. आमदार राणेंची सध्याची आंदोलनाची भूमिका म्हणजे ‘मांजर मारून काशीला जाऊन पाप धुवून येण्यासारखी’ आहे, अशी टीका काळसेकर यांनी यावेळी व्यक्त केली.नीतेश राणे यांचे वक्तव्य पूर्णत: चुकीचे व अभ्यासहीन आहे. गौण खनिज बंदीचा मोर्चा असतो की रेल रोको आंदोलन असो राणे कुटुंबीयांना सत्तेत असताना व विरोधी पक्षात असताना जनतेचे प्रश्न आंदोलन करून कसे सोडवायचे हे समजलेच नाही, असे ते म्हणाले. कॉँग्रेसच्या सत्ताकाळात बनलेल्या आराखड्यात बदल करण्याचे अधिकारी केंद्राचे आहेत. लोकांना भावना भडकावण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही. कणकवली, कुडाळ तालुक्यात भाजपा पदाधिकारी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामस्थांकडून हरकती घेऊन आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही काळसेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.नारायण राणे यांनी विकासाला विरोध करू नका, अशी भूमिका घेतली. आमदार नीतेश राणेंना ही भूमिका मान्य नाही का? चौपदरीकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेने हा आराखडा कोणाची हॉटेल्स, संस्था भवने वाचवण्यासाठी करण्यात आला आहे, हे लक्षात घ्यावे. (प्रतिनिधी)कॉँग्रेसने केलेल्या या आराखड्यात बदल सुचवायचे असतील, तर ते केंद्रशासनाकडे सुचवावे लागतील. यासाठी या प्रश्नाचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात संबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.चौपदरीकरणाच्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या ज्या सूचना, हरकती असतील, त्यांनी त्या २ जूनपर्यंत द्यायच्या आहेत, असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.नीतेश यांच्याकडून ग्रामस्थांना भडकावण्याचे काम.२०१०सालीच महामार्गाचा आराखडा बनवण्याचे काम होते सुरू; काळसेकर.