शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलावर खड्डयांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:12 IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 
लोणावळा, दि. 24 -  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाल्याने जलद व सुरक्षित प्रवासासाठी संबोधला जाणारा मार्ग सध्या असुरक्षित बनला असून, अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खड्ड्यांमुळे धोकादायक झालेल्या परिसरात आपल्या वाहनांच्या वेगावर अंकुश ठेवून, सुरक्षित प्रवास करावा.
 
जलद व सुरक्षित प्रवासी मार्ग म्हणून संबोधला जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा स्थापनेपासूनच अनेक कारणे व विविध अपघात आणि दुर्घटनांनी चर्चेत राहिला आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळा खंडाळा घाटमाथा परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. तसेच  मार्गावरील  सिमेंटच्या अनेक ब्लॉकमध्ये मोठे अंतर तसेच चढउतार निर्माण झाले आहे. यामुळे अशी ठिकाणे अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. मुंबईहून पुण्याकडे येताना खंडाळा (बोरघाट) घाटातील दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस किलोमीटर क्रमांक ४३ ते ४४ दरम्यान मार्गावरील सिमेंटचे ब्लॉक खचले असून, त्यांना मोठ मोठ्या चिरा पडल्या आहेत. यामुळे याठिकाणी अनेकवेळा वेगात आलेली हलकी व अवजड वाहने आदळतात.
 
त्याचप्रमाणे विशेषता खंडाळा व लोणावळ्या जवळील कुणे व वलवण पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून, पुलावरील मार्गाची अक्षरशा चाळण झाली आहे. येथील मोठ मोठ्या खड्ड्यांतील लोखंडी सळईयांनी (गज) डोके वर काढले असून, काही ठिकाणी त्या मोकळ्या झाल्या आहेत. वलवण पुलावर तर वाहन चालकांना कोणता खड्डा कसा चुकवायचे हे आव्हान त्यांच्या पुढे उभे राहते. इतर ठिकाणी सुसाट वेगानी येणारी वाहने वलवण पुलावर प्रवेश करताच समोर पडलेल्या खड्ड्यांची चाळण पाहून त्यांची गाळणच होते. जे कोणी खड्ड्यांना न जुमानता सुसाट जातात त्यांना तर आई आणि देवच आठविल्याशिवाय राहत नसेल अशी दैयनिय अवस्था वणवण पुलावरील मार्गाची झाली आहे.  रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने सदर ठिकाणच्या खड्ड्यांची वेळेत व तत्काळ दखल न घेतल्यास प्रवाशांना मोठ्या अपघाती दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. जोपर्यंत वलवण पुलावर खड्ड्यांचे सावट आहे. तो पर्यंत वाहन चालक व प्रवाशांनी वेगावर ताबा ठेवून वाहने सावकाश चालवून आपला प्रवास सुखाचा करावा.