शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’

By admin | Updated: June 28, 2016 10:54 IST

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’...

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’...  अनोखं निसर्गसौंदर्य, काजवा महोत्सव आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेले हे शहर म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे...
 
हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़ अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल आणि काजवा महोत्सव पहायचा असेल तर अकोलेला जायलाच हवे.
सर्वात उंच म्हणजे 1646 मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघरही अकोले तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात, तेव्हाचा जलोत्सव आणि ऑक्टोबरनंतरचा फुलोत्सव तर जूनमधील काजवा महोत्सव पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले अकोलेची वाट धरतात. 
अनेकजण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई, रतनगड-घाटघर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला, बितनगड अशी ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत.
 
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
 
अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे 
 
भंडारदरा धरण- 
या धरणाचा परिसर चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आह़े भंडारदरा धरणाच्या उजवीकडून घाटघर-साम्रद-रतनगडमार्गे पुन्हा भंडारदरा अशी परिक्रमा केल्यास फेसाळणारे धबधबे मनाला लुब्ध करतात.
 
साम्रद - 
घाटघरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेली सांदणदरी़ या दरीत जाण्याऐवजी दूरुनच पावसाचा आनंद घ्यावा़ 
 
रतनगड - 
साम्रदपासून आठ किलोमीटरवर रतनगड हा प्राचीन किल्ला आहे. 
 
कळसुबाई - 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखऱ हे शिखर आणि कळसुबाईच्या रांगेतच अलंग, मलंग, कुलंग आणि मदनगड हे किल्ले साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. 
 
रंधा धबधबा - 
भंडारद-यापासून 10 किलोमीटरवर असलेला हा धबधबा 17 फूट उंचीवरुन खाली कोसळताना पाहणो डोळ्याचे पारणो फेडणारे ठरते. याशिवाय अंब्रेला, नेकलेस धबधबेही पाहण्यासारखीच आहेत.
 
हरिश्चंद्रगड - 
साहसी पर्यटकांना आव्हान देत हा गड उभा आहे. सुमारे सोळाशे वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर, दहा गुहा आणि अनेक औषधी व दुर्मीळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे हरिश्चंद्रगडाचे वैशिष्टय़ सांगता येईल़ गडावरील कोकणकडा आणि त्याच रांगेत कुंतलगड आहे. 
 
काय पहाल ?
जूनमध्ये काजवा महोत्सव, यानंतर धो-धो कोसळणारा पाऊस आणि फेसाळणारे प्रचंड धबधबे, हिरवागार निसर्ग
घाटघरचा कोकणकडा- सांम्रद, येथील सांदणदरी, रतनवाडी, प्राचीन हेमाडपंथी अमृतेश्वराचे मंदिर, रतनगड
गिर्यारोहणासाठी- अलंग, मलंग, कुलंग हे दुर्ग
भंडारदरा- निळाशार जलाशय, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची व्यवस्था, मनाला भुरळ घालणारे आकर्षक उद्यान
रंधा- पर्यटन विकासातून केलेले विलोभनीय काम, रंधा धबधबा
हरिश्चंद्रगड परिसर- पावसाळ्यात जलोत्सव, ऑक्टोबरनंतर फुलोत्सव, महाकाय कोकणकडा, हरिश्चंद्रगड
अकोले येथे महामुनी अगस्ती महाराजांचे मंदिर
टाकाहारी येथे प्राचीन देवीचे मंदिर
विश्रमगड-शिवाजी महाराजांचे विश्रंतीस्थान आणि येथे अवतरत असलेली शिवसृष्टी
 
कसे जाल?
मुंबईहून कसारा-इगतपुरी-घोटी-वारंघुशी-भंडारदरा
एकूण अंतर 180 किलोमीटर
पुण्याहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदरा
एकूण अंतर 170 किलोमीटर
नाशिकहून घोटी-बारी-वारंघुशी-भंडारदरा
एकूण अंतर 80 किलोमीटर
शिर्डीहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदरा
एकूण अंतर 90 किलोमीटर
 
निवास व्यवस्था
भंडारदरा येथे पर्यटन विकास महामंडळाने निवासी खोल्या बांधलेल्या आहेत़ वन्यजीवमार्फत तीन क्लासवन सूट, 2 जनरल सूट आहेत़ 
घाटघर येथे वन्यजीवमार्फत सहा खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध होऊ शकतात़ 
गृहपर्यटनमधून रतनवाडी, घाटघर, सांम्रद येथे 18 खोल्या उपलब्ध आहेत़ 
याशिवाय खासगी रिसोर्टमध्येही निवासाची व्यवस्था होऊ शकत़े पर्यटकांना टेंटमध्ये रहायचे असल्यास टेंटही उपलब्ध करुन दिले जातात
 
ऑक्टोबरमधील पुष्पोत्सव 
हरिश्चंद्रगड परिसरात असंख्य आणि विविध रंगी फुलांचा पुष्पोत्सव ऑक्टोबरमध्ये बहरतो़ हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची अनुभूती देणारा हा फुलोत्सव पावसाळा संपत आल्यानंतर सुरु होतो़ दर सात वर्षानी फुलणारी ‘कारवी’ हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा हरिश्चंद्रगडावर निळी शाल पांघरल्याचे दिसते. आता 2017 ला ही कारवी फुलणार असल्याचे सांगितले जाते.
 
काजवा महोत्सव 
घाटघर आणि रतनवाडी परिसरात जूनच्या पंधरवाडय़ात रात्रीच्या वेळी झाडांवर प्रकाशमान झालेली फुले अवतरलेली पहायला मिळतात़ ही फुले म्हणजे असंख्य काजव्यांचे पुंजक़े यालाच या परिसरात काजवा महोत्सव म्हणतात़ हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य हौशी घाटघर परिसरात टेंट उभारुन राहतात.