शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया)

By admin | Updated: July 1, 2016 15:04 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे

 - मनोज ताजने

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे स्थळ मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे. उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले.जायचं कसं?-जवळचे विमानतळ - नागपूर- १८० किलोमीटर- बिरसी (गोंदिया)- ६० किलोमीटरजवळचे रेल्वे स्थानक - दरेकसा (फक्त पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १.५ किलोमीटर- सालेकसा (काही एक्सप्रेस व सर्व पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १० किलोमीटर- गोंदिया (सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा स्टॉप) - ५२ किलोमीटररस्ता मार्ग- नागपूरवरून १९० किलोमीटर (स्पेशल गाडीने येणे सोईस्कर).- गोंदियावरून ५५ किलोमीटर (एसटी बस उपलब्ध)(दरेकसा गाडीने पावणे दोन तासात पोहोचता येते. बस हाजराफॉल गेटजवळ थांबते)

बरोबर काय न्यावे आणि काय नेऊ नये-- सोबत खाण्यापिण्याचे पदार्थ न्यावेत.

- ध्वनीवर्धक यंत्र किंवा मादक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.राहण्याची सोय आहे का? की एका दिवसाची पिकनिक करावी-- पिकनिक एका दिवसाची करणे सोयीचे आहे. कारण तिथे मुक्कामाची सोय नाही. सालेकसा या तालुका मुख्यालयी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात बुकींग करून राहता येते. सालेकसा येथे भोजनालयाची व्यवस्था आहे. किंवा जिल्हा मुख्यालय असलेल्या गोंदिया येथे मुक्कामासाठी सर्व प्रकारची सोय आहे.पॉइंटचे ऐतिहासिक  महत्व. -- १५० वर्षापूर्वी मुंबई-हावडा (कोलकाता) रेल्वेमार्ग दरेकसा नजिक मोठ्या पर्वतरांगेत रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला. परंतू पहाडाच्या वरील भागातून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी बोगद्यातून खाली पडू लागले. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेसेवा विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी त्यावेळचे इंग्रजकालीन रेल्वे अभियंता हाजरा यांनी डोंगरातून येणारे सर्व पाणी एकत्रितपणे खाली प्रवाहित करण्यासाठी पहाडाचा काही भाग कापून तशी व्यवस्था केली. ते पडणारे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडू लागले. तेव्हापासून हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले. आता त्या ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांसाठी विविध प्रकारे साहसी खेळ खेळण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत असतात.

  आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

  •  

 

  •  

 

  •