शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुंबईकरांचा पिकनिक मूड

By admin | Updated: October 23, 2014 04:07 IST

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीनिमित्त लागलेल्या सुट्या पाहता काही मुंबईकरांनी यंदाची दिवाळी मुंबईबाहेरच साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गोव्यासह परदेशातील ठिकाणांना सर्वाधिक पसंती देण्यात आली असून रेल्वेसह विमानसेवा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र दिवाळीतील सुट्यांचे व्यवस्थित नियोजन न केल्याने काहींना रेल्वे आणि विमानांच्या वाढलेल्या भाड्याचा मोठा फटकाही बसला आहे.सरकारी तसेच खासगी कार्यालयांना २३ ते २६ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीची सु्टी मिळाली आहे. त्यामुळे या सुट्यांचे नियोजन करत मुंबईकरांनी दिवाळी मुंबईबाहेर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची एकच गर्दी पाहता रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर विमान कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष आॅफर दिल्या आहेत. यंदा मुंबईकरांनी पिकनिकसाठी परदेशातील ठिकाणेही निवडली असून थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूरला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नसल्याने आणि चार दिवसांत या टूर होत असल्याने या ठिकाणी जाण्यास अनेक उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे भारतातील केरळ, राजस्थान, उटी यांना तर राज्यातील अलिबाग, पुणे तसेच गोवा या ठिकाणीही जाण्यास मुंबईकर पसंती देत आहेत. (प्रतिनिधी)