शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

याचिकाकर्त्या २४ कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी 6 आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश

By admin | Updated: September 8, 2016 20:02 IST

कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ उलटून गेल्यानंतरही गृह विभागाने त्यांच्या शिक्षेच्या कालावधी निश्चितीचा निर्णय घेतला नाही.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ उलटून गेल्यानंतरही गृह विभागाने त्यांच्या शिक्षेच्या कालावधी निश्चितीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे ३९ कैद्यांनी खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांच्या अनुषंगाने २४ कैद्यांसंदर्भात गृह विभागाने सहा आठवड्यात निर्णय जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी दिला आहे. वरील विहीत मुदतीत निर्णय घेतला नाही तर गृह विभागाचे प्रधान सचिव यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. पैठण येथील खूल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे दिलीपकुमार क्षिरसागर यांच्यासह वीस आणि बाबासाहेब पातोड यांच्यासह १९ अशा ३९ कैद्यांनी अ‍ॅड. रुपेश जैस्वाल यांच्या मार्फत खंडपीठात दोन याचिका दाखल केल्या होत्या. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर किमान १४ वर्षाची शिक्षा पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधीत कैद्यांच्या वर्तवणूकीच्या अहवालावरुन कैद्याने अठरा वर्ष , वीस किंवा चोवीस वर्षाची शिक्षा भोगावी याचा निर्णय राज्य शासनाने घेणे अपेक्षीत असते. कैद्याची मुळ म्हणजे १४ वषार्ची शिक्षा पुर्ण होईपर्यंत पुढील शिक्षा ठरवणे अपेक्षीत असताना, या कैद्यांना २४ ते २६ वर्ष उलटूनही राज्य शासनाने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेतला नाही. त्यांचे नातेवाईक गृह विभागात चकरा मारत असता त्यांनाही दाद देण्यात आली नाही. म्हणून याचिका दाखल करण्यात आल्या.याचिका दाखल झाल्यावर शासनाने ११ कैद्यांची मुक्तता केली. ४ कैद्यांच्या शिक्षेच्या कालावधीसंदर्भात संबंधीत कारागृहाकडे अहवाल पाठवले. उर्वरित २४ कैद्यांच्या संदर्भात निर्णय झालेला नव्हता. याचिकेच्या सुनावणीनंतर खंडपीठाने उर्वरित सर्व कैद्यांच्या संदर्भात सहा आठवड्यात निर्णय घ्यावा अन्यथा गृह विभागाच्या प्रधान सचिवांना जबाबदार धरण्यात येईल, असे आदेश देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रुपेश जैस्वाल तर शासनातर्फे अ‍ॅड. एम. एम. नेरलीकर यांनी काम पाहिले.