शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भारनियमनप्रकरणी वीज ग्राहक संघटना दाखल करणार याचिका

By admin | Updated: May 8, 2017 05:02 IST

महावितरणकडून करण्यात आलेले ४ हजार मेगावॅटचे भारनियमन म्हणजे सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणकडून करण्यात आलेले ४ हजार मेगावॅटचे भारनियमन म्हणजे सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना असून, हे भारनियमन संपूर्णपणे बेकायदेशीर, अनावश्यक आणि आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे. परिणामी बेकायदेशीर आणि आदेशबाह्य भारनियमनाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल करण्यात येणार आहे.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी यासंदर्भात सांगितले की, दरवर्षी उन्हाळ्यात राज्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी वीजग्राहकांची मागणी वाढते. सध्याची कमाल मागणी १९ हजार मेगावॅटपर्यंत गेली आणि एकूण उपलब्ध क्षमता ३३ हजार ५०० मेगावॅट आहे. तरीही सर्व ग्राहकांना पुरेशी वीज देता येत नाही ही दिवाळखोरी आहे. देखभाल दुरुस्तीसाठी बंद होणाऱ्या निर्मिती संचाचे वेळापत्रक आधीच निश्चित झालेले असते. केवळ अनपेक्षित व अकस्मात घट वीजनिर्मितीमध्ये झाली तरच प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी तातडीने वीज उपलब्ध करून घ्यावी लागते. याबाबत प्रशासन पूर्णत: अयशस्वी ठरले आहे. बंद प्रकल्प सुरू करून पुरेशी वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. याकरिता विलंब लागत असल्यास पॉवर एक्स्चेंजमधून अथवा खासगी पुरवठादाराकडून अल्प मुदतीने वीज खरेदी करत राज्य भारनियमनमुक्त ठेवले पाहिजे. ही जबाबदारी महावितरण, महानिर्मिती आणि राज्य सरकारची आहे, असे प्रताप होगाडे यांनी सांगितले.