शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंत्रालयात न भेटल्याने मुख्य सचिवांविरुद्ध याचिका; तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

By यदू जोशी | Updated: October 8, 2017 03:05 IST

राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आपल्याला मंत्रालयात येऊनही भेट दिली नाही, असे सांगत एका नागपूरकराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर तीन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी दिले आहेत.बी. एस. बडवाईक या नागपूरकर व्यक्तीने याचिकेत म्हटले आहे की, ते २७ सप्टेंबर २०१७ रोजी मंत्रालयात आले होते. काही महत्त्वाच्या सार्वजनिक बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अभ्यागतांसाठी भेटीच्या वेळेत मुख्य सचिवांच्या कार्यालयात गेलो होतो. तथापि, मुख्य सचिव आता भेटू शकणार नाहीत, असे म्हणून आपल्याला परत पाठविण्यात आले. मुख्य सचिवांना सामान्य नागरिक म्हणून भेटण्याचा आपला हक्क डावलण्यात आला, अशी कैफियत बडवाईक यांनी मांडली आहे. आपल्याला आधी सहा-सात वेळा असा अनुभव आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.मंत्रालयात विविध विभागांच्या सचिवांनी नागरिकांना एक तास भेटावे, असा नियम असून त्यासाठीची वेळही ठरवून देण्यात आली आहे. मात्र, अनेकदा अनेक सचिव त्या वेळेत कार्यालयातच नसतात किंवा असले तरी बैठकींमध्ये व्यग्र असतात. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नागरिकांशी धड न बोलता बोळवण करतात, असा अनुभव बरेचदा येतो. आता भेट नाकारण्यात आलेल्या एका नागपूरकरास थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाºयांना त्यांचे शासकीय ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य केले आहे.गळ्यात पास लावूनच फिरामंत्रालय आणि नवीन प्रशासन भवन येथील सुरक्षिततेच्या दृष्टीने अभ्यागतांना देण्यात येणाºया प्रवेश पासच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. अभ्यागतांना तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आलेला प्रवेशपास त्यांनी दोन्ही इमारतींमध्ये वावर असेपर्यंत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. तसेच बाहेर जाताना त्यांनी प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांकडे पास परत करावा, असा आदेश गृह विभागाने काढला असून, शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय