शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

शेतकऱ्यांना हवी कायमस्वरूपी टोलमुक्ती

By admin | Updated: July 16, 2017 01:04 IST

तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तुम्ही स्वेच्छेने तुमची जमीन देताय ना, शासनाचा तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना आणि जमिनीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत ना? असे प्रश्न विचारून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरेदीखत स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची शनिवारी साक्ष काढली. मात्र, त्यातीलच एका शेतकऱ्याने आमच्या जमिनी या प्रकल्पासाठी आम्ही देत आहोत, तर आम्हा शेतकऱ्यांना जिवंत असेपर्यंत या महामार्गावर टोलमुक्ती मिळेल ना, असा प्रश्न थेट पालकमंत्र्यांना करताच सगळ्यांनी आपले कान त्यांच्या उत्तरासाठी टवकारले. तुमची मागणी योग्य असून तुमच्यासाठी टोलमुक्ती देण्याकरिता विचार करू, असे आश्वासन दिले.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या, त्यांना शिंदे यांच्या हस्ते खरेदीखत देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. समृद्धी महामार्गाला शिवसेनापक्षप्रमुख विरोध करत असताना दुसरीकडे शिंदे खरेदीखत देत असलेल्या या विसंगतीवर माध्यमांनी बोट ठेवल्याने शुक्रवारपासून या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून वेळेत दोनतीन वेळा बदल करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी उद्धव ठाकरे व शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिंदे नियोजन भवनात पोहोचताच क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या हस्ते तीनही शेतकऱ्यांना खरेदीखत देण्यात आले. तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आणि तुम्ही जमिनी स्वत:हून देताय ना? असे प्रश्न शिंदे यांनी शेतकऱ्यांना विचारले. आमच्यावर कोणाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संंबंधित नाहीत. चांगल्या कामासाठी जमीन जातेय म्हणून आम्ही दिली. उलट, अपेक्षेपेक्षा शासनाने आम्हाला जास्त रक्कम दिली आहे, अशी भावना शेतकऱ्यांंच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गणेश राऊत यांच्या मुखातून वदवून घेण्यात आली. काही शेतकऱ्यांनी पैसे जमा झाल्याचे बँकेकडून मोबाइलवर आलेले एसएमएसही शिंदे यांना दाखवले. आधी शहापुरात नियोजित असलेला कार्यक्रम तेथे आंदोलन होण्याच्या भीतीने ठाण्यात घेतला का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुंबईतील रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमाला सकाळी हजर राहायचे असल्याने शहापूर येथील कार्यक्रम रद्द केला, असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाविरुद्ध जे आंदोलन करीत आहेत, त्यांची तेथे इंचभरही जमीन नाही. काही जण शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू पाहत आहेत. हे प्रकार समोर आणले पाहिजे, या आरोपाचा शिंदे यांनी पुनरुच्चार केला. अशा आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची वेळ आली तर नक्कीच करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दिले. या वेळी उपस्थित असलेले शहापूर तालुक्यातील अंदाड गावाचे अध्यक्ष शरद मोगरे यांनी आपल्या गावाने १०० टक्के संमतीपत्र दिले असून लवकरत नोंदणीप्रक्रिया चालू होणार असल्याचे सांगितले. आणखी ३२३ शेतकऱ्यांकडून संमतीपत्रशासनाने गणपत धामणे यांची ७० गुंठे जमीन खरेदी केली असून ७२ लाख ९१ हजार ७२४ रुपये, दौलत धानके यांना ८५ गुंठे जमिनीसाठी ७९ लाख७ हजार २७० रु पये तर गणेश राऊत यांच्या ४३ गुंठे जमिनीसाठी ३ लाख १६ हजार ३०८ रु पये इतका मोबदला त्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामागोमाग ठाण्यातील कसारा, वाशाळा, खर्डी, रातांधले, हिव, खुटघर, रास, अंदाड या गावांकडून १०० टक्के संमतीपत्रे आली असून येथील शेतकऱ्यांची संख्या ३२३ इतकी आहे. ५२ लाख ते ५ कोटी रु पये प्रतिहेक्टर दरशहापूर तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या २८ पैकी २३ गावांतील जमीनविक्र ीचे दर निश्चित करण्यात आले असून ही किंमत ५२ लाख ते ५ कोटी रु पये इतकी प्रतिहेक्टर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिली.