शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

पेप्सिको कंपनी नांदेडमध्ये फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार

By admin | Updated: March 1, 2017 04:52 IST

पेप्सिको कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर सहकार्य करून कृषी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार

मुंबई : पेप्सिको कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर सहकार्य करून कृषी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून कंपनी नांदेडमध्ये सुमारे १८० कोटी रु पये गुंतवणूक करु न फळ प्रक्रि या प्रकल्प उभारणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्यात चर्चा झाली. खेड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनचे नुयी यांनी कौतुक करून त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. कुशल मनुष्यबळ विकासासाठी महाराष्ट्र शासन व पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.नांदेडच्या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पेप्सिकोच्या आशिया, मध्यपूर्व व उत्तर आफ्रिका विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्डा, पेप्सिको इंडियाचे चेअरमन शिव कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.फडणवीस यांनी पेप्सिको कंपनीच्या गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करून या प्रकल्पासाठी राज्य शासन मदत करणार असल्याचे सांगितले. नुयी म्हणाल्या की, महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचे राज्य असून येथे सुमारे १२ हजार कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात शीतपेयासाठी लागणाऱ्या लिंबूवर्गीय फळांचे क्लस्टर तयार करणार आहे.कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर व पेप्सिको इंडियाचे चेअरमन शिव कुमार यांनी करारावर स्वाक्षरी केली. (विशेष प्रतिनिधी)