शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 06:43 IST

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

 नवी मुंबई : महाराष्ट्रात सर्वांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेचा कोणताही प्रचार न करता विस्तार होत आहे. ही भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते. त्याबरोबरच आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा शिकणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी वाशी येथे केले.

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खा. स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंदजी परिव्रजक, राजकुमार दिवाण, धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या नेरूळ येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलचे विद्यार्थी नमन ठाकूर, कुमार दिव्यम झा, वंशिका चंद, सान्वी शरण, तसेच वाशीच्या फादर ॲग्नेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिद्धेश रूपेश काळे, वाणी कौर चोप्रा, वाशी इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद, एपीजे स्कूल नेरूळच्या संहिता रंगराजन, एपीजे स्कूल नेरूळचा विद्यार्थी अनंतजीत पांडे, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, पनवेलची विद्यार्थिनी ईशा जाधव यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

प्रत्येक विद्यार्थ्याची आवड-निवड वेगवेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे. आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे आवाहन कोश्यारी यांनी केले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीmarathiमराठी