शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते..."; नितीन गडकरींनी नेत्यांना फटकारले

By भागवत हिरेकर | Updated: March 22, 2025 19:02 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक वीण उसवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना नेत्यांना फटकारले. जातीयवादाला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. 

Nitin Gadkari News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सामाजिक एकोप्याला नख लावलं जात असल्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल चिंताही व्यक्त होतेय. याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी रोखठोक मत मांडले. 'जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते स्वार्थासाठी जात पुढे करतात', अशा शब्दात राजकारण्यांना सुनावले. ते अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जातीयवादावर भाष्य केले. 

गडकरी म्हणाले, पुढारी जातीयवादी आहेत

नितीन गडकरी म्हणाले, "मी लोकसभेत निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, माझ्या आयुष्यात राजकारण चालेल, तुमच्या आयुष्यात नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल, तर द्या नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेल. नाही देणार त्याचंही काम करेल. मी हे उद्धटपणे नाही बोललो."

"मला सगळ्या लोकांनी मतदान केलं. हे पुढारी जात निर्माण करतात. जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात. कारण मागासपणा हा राजकीय स्वारस्याचा विषय आहे. कोण सर्वात जास्त मागास ही स्पर्धा आहे", असे भाष्य गडकरींनी केले. 

नितीन गडकरींनी सांगितला बिहारमधील किस्सा

यावेळी गडकरींनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभवही संगितला. ते म्हणाले, "मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातो. जसे आपल्याकडे मराठा-कुणबी आहेत, तसे तिकडे ब्राह्मण जात आहे. मी गेलो होतो. ते म्हणाले पंडित नितीन गडकरी आले. मी म्हटलं प्रश्न पडला पंडित का म्हणत आहेत? मी त्याला बोलावलं आणि विचारलं की, माझं पंडित म्हणून का नाव घेत आहात?" 

...अन् गडकरी म्हणाले, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही 

गडकरी पुढे सांगताना म्हणाले, "तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाहीये. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या ब्राह्मणांच्या मनात जर दुसरं कुठलं नाव आहे, तर ते पंडित नितीन गडकरींचं नाव आहे, तुमचं नाव आहे. मी म्हणालो, जे काही असेल. पण, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही. हे मी नाही करणार. खऱ्या अर्थाने खालचं वातावरण बदललं आहे. ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे." 

"माणूस हा जातीने मोठा नाहीये, गुणांनी मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मी कमीत कमी ती माझ्या व्यवहारात ठेवता कामा नये. या दोन गोष्टींमध्ये सुधारलं तर हळूहळू समाज बदलेल ना", अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीPoliticsराजकारणAmravatiअमरावती