शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते..."; नितीन गडकरींनी नेत्यांना फटकारले

By भागवत हिरेकर | Updated: March 22, 2025 19:02 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक वीण उसवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना नेत्यांना फटकारले. जातीयवादाला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. 

Nitin Gadkari News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सामाजिक एकोप्याला नख लावलं जात असल्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल चिंताही व्यक्त होतेय. याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी रोखठोक मत मांडले. 'जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते स्वार्थासाठी जात पुढे करतात', अशा शब्दात राजकारण्यांना सुनावले. ते अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जातीयवादावर भाष्य केले. 

गडकरी म्हणाले, पुढारी जातीयवादी आहेत

नितीन गडकरी म्हणाले, "मी लोकसभेत निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, माझ्या आयुष्यात राजकारण चालेल, तुमच्या आयुष्यात नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल, तर द्या नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेल. नाही देणार त्याचंही काम करेल. मी हे उद्धटपणे नाही बोललो."

"मला सगळ्या लोकांनी मतदान केलं. हे पुढारी जात निर्माण करतात. जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात. कारण मागासपणा हा राजकीय स्वारस्याचा विषय आहे. कोण सर्वात जास्त मागास ही स्पर्धा आहे", असे भाष्य गडकरींनी केले. 

नितीन गडकरींनी सांगितला बिहारमधील किस्सा

यावेळी गडकरींनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभवही संगितला. ते म्हणाले, "मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातो. जसे आपल्याकडे मराठा-कुणबी आहेत, तसे तिकडे ब्राह्मण जात आहे. मी गेलो होतो. ते म्हणाले पंडित नितीन गडकरी आले. मी म्हटलं प्रश्न पडला पंडित का म्हणत आहेत? मी त्याला बोलावलं आणि विचारलं की, माझं पंडित म्हणून का नाव घेत आहात?" 

...अन् गडकरी म्हणाले, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही 

गडकरी पुढे सांगताना म्हणाले, "तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाहीये. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या ब्राह्मणांच्या मनात जर दुसरं कुठलं नाव आहे, तर ते पंडित नितीन गडकरींचं नाव आहे, तुमचं नाव आहे. मी म्हणालो, जे काही असेल. पण, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही. हे मी नाही करणार. खऱ्या अर्थाने खालचं वातावरण बदललं आहे. ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे." 

"माणूस हा जातीने मोठा नाहीये, गुणांनी मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मी कमीत कमी ती माझ्या व्यवहारात ठेवता कामा नये. या दोन गोष्टींमध्ये सुधारलं तर हळूहळू समाज बदलेल ना", अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीPoliticsराजकारणAmravatiअमरावती