शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रलंबित कृषिपंप जोडणी शेतक-यांच्या मुळावर

By admin | Updated: July 3, 2015 23:57 IST

अमरावती परिमंडळात ४६ हजार १९४ शेतकरी प्रतीक्षेत; आणखी करावी लागणार वर्षभराची प्रतीक्षा.

राजेश शेगोकार / बुलडाणा : कृषिपंपांच्या वीज जोडणीबाबत महावितरणच्यावतीने होत असलेल्या दिरंगाईला कंटाळून अकोल्यात तीन शेतकर्‍यांनी आतापर्यंत जिवाची बाजी लावली. या पृष्ठभूमीवर अमरावती परिमंडळात येणार्‍या पाचही जिल्ह्यातील कृषिपंपांच्या वीज जोडणीची माहिती घेतली असता, तब्बल ४६ हजार १९४ शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. एकीकडे पावसाने दिलेली उघाड व दुसरीकडे शेतात असलेले पाणी पिकांना देऊन ती वाचविण्याची शेतकर्‍यांची धडपड यामध्ये कृषिपंपांच्या वीज जोडणीचा अडसर येत आहे. या रखडलेल्या वीज जोडण्या शेतकर्‍यांच्या मुळावर उठल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात कृषिपंपांच्या वीज जोडणीचा अनुशेष मोठय़ा प्रमाणात असल्याचा आरोप भाजपने केला होता. सत्ता आल्यावर कृषिपंपांना तात्काळ वीजपुरवठा उपलब्ध करू, असे आश्‍वासनही भाजपने दिले होते; मात्र सत्ता आल्यावरही गेल्या वर्षभरात हा प्रश्न सुटलेला नाही. वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतीच असून, त्या तुलनेत वीज जोडणीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. यंदाच्या खरीप हंगामात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, तर मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे लगबगीने पेरण्या आटोपल्या. गेल्या २0 जूनपासून मात्र पावसाने दडी मारली आहे. पावसाच्या या लपंडावामुळे पेरण्या उलटण्याची स्थिती असून, खरिपाचा हंगाम हातून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याने मंगळवारी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तुरळक पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केल्याने खरिपाच्या हंगामावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पृष्ठभूमीवर ज्या शेतकर्‍यांकडे पाणी आहे, त्यांना पिके वाचविण्याची धडपड करावी लागणार आहे; मात्र त्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणी देणे आवश्यक आहे.

*वर्षभरात ११ हजार जोडण्या

अमरावती परिमंडळात वर्षभरामध्ये ११ हजार ६९६ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १५९२, वाशिम १0२३, अमरावती ३२८४, बुलडाणा ३७१६ व यवतमाळ जिल्ह्यात २0८१ जोडण्यांचा समावेश आहे.

*१0७ कोटींची कामे सुरू

कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी महावितरण आता वेगाने कामाला लागला असून, अमरावती परिमंडळात १0७ कोटींची कामे सुरू झाली आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १४ कोटी, अमरावती जिल्ह्यात ३३ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात २२ कोटी, वाशिम जिल्ह्यात १२ व यवतमाळमध्ये २६ कोटींच्या कामाची कंत्राटे दिली आहेत. कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश महावितरणने दिले.