शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण हॉर्न वाजवल्यास भरावा लागणार दोन हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: June 29, 2017 23:02 IST

विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अँड रोड सेफ्टी अ‍ॅक्ट, २०१७ मध्ये नाहक, सातत्याने हॉर्न वाजवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असलेल्या ठिकाणी हॉर्न वाजवणेही गुन्हा ठरणार आहे. मात्र त्यासाठी सरकारला राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. या कायद्याच्या कलम २० अंतर्गत चालकांनी अनावश्यक किंवा सतत किंवा गरजेपेक्षा अधिक काळ हॉर्न वाजवल्यास त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. तसेच शांतता क्षेत्रातही हॉर्न वाजवणाऱ्यावरही गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे. त्याशिवाय मल्टीटोन हॉर्न, वाहन चालवताना अलार्मसारखा आवाज येणे इत्यादींवरही कारवाई करण्यात येणार आहे. याच कायद्याच्या कलम २३ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण नियम, २००० चे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येते तरी संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कांकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला राज्यातील १० महानगरांच्या आवाजाच्या पातळीचे मोजमाप करणार असून त्यात नागपूर व मुंबईचा समावेश असल्याची माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. ‘नागपूरमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू झाले असून त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि पनवेलमध्ये एका आठवड्यात आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू होईल,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. सहाय्यक पोलीस महाअधीक्षक विजय खरात यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, या सर्व महानगरांची आवाजाची पातळी मोजण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) निरीला दिले आहे. ‘मुंबई व मुंबईबाहेर दहा ठिकाणांची आवाजाची पातळी सातत्याने तपासण्यात येत आहे. त्यासाठी एमपीसीबीने स्टेशनही बसवले आहे. त्यात वडाळा, वांद्रे, पवई, अंधेरी,कांदिवली, फोर्ट, चेंबूर, ठाणे, वाशी आणि महापेचा समावेश आहे. त्यापैकी पाच स्टेशनवरील आवाजाच्या पातळीची नोंदणी एमपीसीबीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राज्यातील २७ शहरांच्या आवाजाची पातळी मोजण्याचा निर्णय एमपीसीबीने घेतला आहे. त्यासाठी संबंधित महापालिकांचीही मदत घेण्यात येईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.