शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

विनाकारण हॉर्न वाजवल्यास भरावा लागणार दोन हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: June 29, 2017 23:02 IST

विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अँड रोड सेफ्टी अ‍ॅक्ट, २०१७ मध्ये नाहक, सातत्याने हॉर्न वाजवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असलेल्या ठिकाणी हॉर्न वाजवणेही गुन्हा ठरणार आहे. मात्र त्यासाठी सरकारला राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. या कायद्याच्या कलम २० अंतर्गत चालकांनी अनावश्यक किंवा सतत किंवा गरजेपेक्षा अधिक काळ हॉर्न वाजवल्यास त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. तसेच शांतता क्षेत्रातही हॉर्न वाजवणाऱ्यावरही गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे. त्याशिवाय मल्टीटोन हॉर्न, वाहन चालवताना अलार्मसारखा आवाज येणे इत्यादींवरही कारवाई करण्यात येणार आहे. याच कायद्याच्या कलम २३ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण नियम, २००० चे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येते तरी संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कांकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला राज्यातील १० महानगरांच्या आवाजाच्या पातळीचे मोजमाप करणार असून त्यात नागपूर व मुंबईचा समावेश असल्याची माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. ‘नागपूरमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू झाले असून त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि पनवेलमध्ये एका आठवड्यात आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू होईल,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. सहाय्यक पोलीस महाअधीक्षक विजय खरात यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, या सर्व महानगरांची आवाजाची पातळी मोजण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) निरीला दिले आहे. ‘मुंबई व मुंबईबाहेर दहा ठिकाणांची आवाजाची पातळी सातत्याने तपासण्यात येत आहे. त्यासाठी एमपीसीबीने स्टेशनही बसवले आहे. त्यात वडाळा, वांद्रे, पवई, अंधेरी,कांदिवली, फोर्ट, चेंबूर, ठाणे, वाशी आणि महापेचा समावेश आहे. त्यापैकी पाच स्टेशनवरील आवाजाच्या पातळीची नोंदणी एमपीसीबीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राज्यातील २७ शहरांच्या आवाजाची पातळी मोजण्याचा निर्णय एमपीसीबीने घेतला आहे. त्यासाठी संबंधित महापालिकांचीही मदत घेण्यात येईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.