शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
5
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
6
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
7
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
8
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
9
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
10
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
11
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
12
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
15
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
16
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
17
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
18
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
19
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
20
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण हॉर्न वाजवल्यास भरावा लागणार दोन हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: June 29, 2017 23:02 IST

विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्यांना शासनाने लगाम लावायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अँड रोड सेफ्टी अ‍ॅक्ट, २०१७ मध्ये नाहक, सातत्याने हॉर्न वाजवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असलेल्या ठिकाणी हॉर्न वाजवणेही गुन्हा ठरणार आहे. मात्र त्यासाठी सरकारला राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. या कायद्याच्या कलम २० अंतर्गत चालकांनी अनावश्यक किंवा सतत किंवा गरजेपेक्षा अधिक काळ हॉर्न वाजवल्यास त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. तसेच शांतता क्षेत्रातही हॉर्न वाजवणाऱ्यावरही गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे. त्याशिवाय मल्टीटोन हॉर्न, वाहन चालवताना अलार्मसारखा आवाज येणे इत्यादींवरही कारवाई करण्यात येणार आहे. याच कायद्याच्या कलम २३ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण नियम, २००० चे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येते तरी संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कांकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला राज्यातील १० महानगरांच्या आवाजाच्या पातळीचे मोजमाप करणार असून त्यात नागपूर व मुंबईचा समावेश असल्याची माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. ‘नागपूरमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू झाले असून त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि पनवेलमध्ये एका आठवड्यात आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू होईल,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. सहाय्यक पोलीस महाअधीक्षक विजय खरात यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, या सर्व महानगरांची आवाजाची पातळी मोजण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) निरीला दिले आहे. ‘मुंबई व मुंबईबाहेर दहा ठिकाणांची आवाजाची पातळी सातत्याने तपासण्यात येत आहे. त्यासाठी एमपीसीबीने स्टेशनही बसवले आहे. त्यात वडाळा, वांद्रे, पवई, अंधेरी,कांदिवली, फोर्ट, चेंबूर, ठाणे, वाशी आणि महापेचा समावेश आहे. त्यापैकी पाच स्टेशनवरील आवाजाच्या पातळीची नोंदणी एमपीसीबीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राज्यातील २७ शहरांच्या आवाजाची पातळी मोजण्याचा निर्णय एमपीसीबीने घेतला आहे. त्यासाठी संबंधित महापालिकांचीही मदत घेण्यात येईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.