शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पवारांची राजकीय दहशत; सुरक्षित अंतर ठेवण्याचा शिवसेना आमदारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:35 IST

शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे.  

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या संभाव्य भूमिकेचे विश्लेषण करण्यात चांगले चांगले विश्लेषक गारद झाले आहेत. तर 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल' असं त्वेषाने सांगणारे माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पवारांच्या चालींसमोर निष्प्रभ झाले आहे. त्याच पवारांची भीती आता, मित्रपक्ष होऊ पाहात असलेल्या शिवसेना आमदारांना वाटायला लागली आहे. 

राजकारणात घट्ट मैत्री किंवा कट्टर शत्रुत्व असं काही नसतं, हे नेहमीच दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही त्याची प्रचिती येत आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सरकार स्थापन्याची शक्यता आहे. मात्र पवारांनी महाशिवआघाडीविषयी केलेलं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं केलेलं कौतुक यामुळे शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. 

शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे.  

दरम्यान पवारांविषयी काहीही निश्चित ठरवणे कठिण आहे. ते कोणत्याही क्षणी आपला स्टँड बदलू शकतात. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पवारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पुढील वाटचाल करावी, असं मत शिवसेना आमदारांच आहे. एकूणच पवारांच्या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ज्याप्रमाणे अस्वस्थता आहे. त्याप्रमाणे मित्रपक्ष होऊ पाहात असलेल्या शिवसेना आमदारांनाही काळजी वाटत आहे.