शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पवारांचे स्वबळाचे हत्यार?

By admin | Updated: June 8, 2014 09:34 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शरद पवार?: राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह, आज ठरणार भूमिका
मुंबई : ‘अब की बार शरद पवार’ असा नारा देऊन स्वबळावर निवडणूक लढवायची, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेत पक्षाची इभ्रत वाचवायची असेल, तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असा सूर पक्षात आहे. विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनात सगळीकडे सध्या हीच चर्चा रंगत आहे. आमदार आणि पदाधिका:यांच्या मते, पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविली तर आम्हाला काँग्रेसची गरज नाही. शंभरावर जागा आम्ही जिंकू. 1999मध्ये निवडणूक निकालानंतर जशी काँग्रेसशी आघाडी केली होती, तशी याहीवेळी करता येईल. पण मुख्यमंत्रिपदावर आमचाच दावा असेल.  
पवार यांनी काल दिवसभर राज्यातील 29 जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली. त्या वेळी पुण्यासह काही जिल्ह्यांमधील नेत्यांनी पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतावे, अशी गळ त्यांना घातली. पवार सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. तथापि, पक्षाचे महाराष्ट्रातून 4 आणि इतर राज्यातून 2 असे 6 खासदार दिल्लीत निवडून गेले आहेत. लोकसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता पवारांसारख्या नेत्यांची दिल्लीत कुठलीही भूमिका राहिलेली नाही.
 
पवार आज काय बोलणार?
च्राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार असून, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकले जाणार आहे. 
च्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार काय भूमिका जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे. पवारांनी महाराष्ट्रात परतावे, असा आग्रह पक्षाकडून होऊ शकतो. 
च्उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र आता काकाच परत आले तर त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाणार आहे.
 
च्पवार यांनी महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह पक्षजन करीत असल्याचे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केले. ते म्हणाले, पवार यांच्या दीर्घ अनुभवाचा, राज्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा फायदा पुन्हा राज्याला व्हावा, असे कार्यकत्र्याना वाटते.