शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

मुंबईसाठीच्या स्वतंत्र समितीला पवारांचा विरोध

By admin | Updated: December 19, 2014 04:42 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याच्या आरोप यापूर्वी विरोधी पक्षांनी केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सात पानी पत्र पाठवून पवारांनी समिती स्थापण्यास कडाडून विरोध केला आहे. स्वत: मोदी यांनीही अशा समितीचे प्रमुखपद स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.मुंबईसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा प्रकार हा महापालिका आणि राज्य शासनाच्या कारभारात केंद्राचा थेट हस्तक्षेप असल्याचा आरोपही शरद पवार यांनी या पत्रात केला आहे. ७४व्या घटनादुरुस्तीनुसार मुंबई महापालिकेचे काम चालते. तिचे बजेटही देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. देशाच्या संघराज्य प्रणाली धक्का देण्याचा हा प्रकार असून पंतप्रधानांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारू नये, असे आवाहनही पवारांनी पत्राद्वारे केले आहे. हा निर्णय घेताना मंत्रिमंडळ, मुंबई महापालिकेला आणि तेथे सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही विश्वासात घेण्यात आले नाही, असा दावा पवारांनी केला आहे. ही समिती म्हणजे राज्यात विचारवंत, योजनाकर्ते आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांची कमतरता असल्याचे द्योतक असल्याचा टोलाही पवारांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)