शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - तटकरे

By admin | Updated: October 9, 2014 04:36 IST

आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई - आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला २००९ च्या निवडणुकीत ६२ जागा मिळाल्या होत्या. आता स्वबळावर सत्तेसाठी पक्षाला १४४ जागा लागतील. वाढीव ८२ जागा कुठून आणणार, या प्रश्नात तटकरे यांनी मान्य केले की मुंबई शहरात त्यांच्या पक्षाची ताकद नाही. तथापि, गेल्यावेळी तीन आमदार जिंकले होते. यावेळी १० पेक्षा अधिक आमदार निवडून येऊ शकतात. विदर्भात आम्ही चारचे चाळीस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र आमचा गड राहिला आहे. मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही आमची कामगिरी सुधारेल, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तटकरे यांनी फेटाळली नाही. राष्ट्रवादीने नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र राहाव्यात अशी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे सरकार झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान्य नसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. या बाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून कोण असावे, हे ठरविण्याचा अधिकार काँग्रेसला कसा असू शकतो? पृथ्वीराज चव्हाण आम्हाला मान्य नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटलेले नव्हते. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही, एवढेच पवार म्हणाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्य हवे अशी विदर्भातील जनतेची इच्छा असेल तर राष्ट्रवादी या इच्छेसोबत असेल पण पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, असे तटकरे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)