शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - तटकरे

By admin | Updated: October 9, 2014 04:36 IST

आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई - आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला २००९ च्या निवडणुकीत ६२ जागा मिळाल्या होत्या. आता स्वबळावर सत्तेसाठी पक्षाला १४४ जागा लागतील. वाढीव ८२ जागा कुठून आणणार, या प्रश्नात तटकरे यांनी मान्य केले की मुंबई शहरात त्यांच्या पक्षाची ताकद नाही. तथापि, गेल्यावेळी तीन आमदार जिंकले होते. यावेळी १० पेक्षा अधिक आमदार निवडून येऊ शकतात. विदर्भात आम्ही चारचे चाळीस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र आमचा गड राहिला आहे. मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही आमची कामगिरी सुधारेल, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तटकरे यांनी फेटाळली नाही. राष्ट्रवादीने नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र राहाव्यात अशी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे सरकार झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान्य नसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. या बाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून कोण असावे, हे ठरविण्याचा अधिकार काँग्रेसला कसा असू शकतो? पृथ्वीराज चव्हाण आम्हाला मान्य नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटलेले नव्हते. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही, एवढेच पवार म्हणाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्य हवे अशी विदर्भातील जनतेची इच्छा असेल तर राष्ट्रवादी या इच्छेसोबत असेल पण पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, असे तटकरे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)