शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - तटकरे

By admin | Updated: October 9, 2014 04:36 IST

आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

मुंबई - आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला २००९ च्या निवडणुकीत ६२ जागा मिळाल्या होत्या. आता स्वबळावर सत्तेसाठी पक्षाला १४४ जागा लागतील. वाढीव ८२ जागा कुठून आणणार, या प्रश्नात तटकरे यांनी मान्य केले की मुंबई शहरात त्यांच्या पक्षाची ताकद नाही. तथापि, गेल्यावेळी तीन आमदार जिंकले होते. यावेळी १० पेक्षा अधिक आमदार निवडून येऊ शकतात. विदर्भात आम्ही चारचे चाळीस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र आमचा गड राहिला आहे. मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही आमची कामगिरी सुधारेल, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तटकरे यांनी फेटाळली नाही. राष्ट्रवादीने नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र राहाव्यात अशी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे सरकार झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान्य नसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. या बाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून कोण असावे, हे ठरविण्याचा अधिकार काँग्रेसला कसा असू शकतो? पृथ्वीराज चव्हाण आम्हाला मान्य नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटलेले नव्हते. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही, एवढेच पवार म्हणाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्य हवे अशी विदर्भातील जनतेची इच्छा असेल तर राष्ट्रवादी या इच्छेसोबत असेल पण पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, असे तटकरे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)