शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारला मिळणार का गती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:27 IST

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे.

विश्वास मोरे पिंपरी, दि. 7 - पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदी सुधार आणि गंगा नदीसुधार हेही खात्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणीनदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधा-यांना आहे. त्यामळे नदीसुधारला गती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतून तीन नद्या वाहतात. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून आणि पवना ही नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. शहराची लोकसंख्या ही बावीस लाखांवर पोहोचली आहे. मुळा आणि इंद्रायणी नदीच्या तुलनेत पवना नदीचे प्रदूषण अधिक आहे, असा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल सांगतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, शहरातील औद्योगिक परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते. शहरामध्ये छोटे-मोठे सुमारे साडेसहा हजार उद्योग आहेत. तसेच हजारो लघुउद्योग सुरू आहेत. जलनिस्सारण अर्थात एसटीपी प्लांट उभारूनही केवळ ८० टक्केंच पाणी प्रक्रिया केले जाते. उर्वरित पाणी तसेच नदीत सोडले जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. नदीप्रदूषणाबाबत महापालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण करण्यांवर अजूनही कडक कारवाई झालेली नाही.

आघाडी सरकारला अपयश

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालखंडात पवना नदीसुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पदाधिका-यांनी गुजरात येथील प्रकल्पांची पाहणी करून संबंधित आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर केला होता. पर्यावरण विषयक जाण नसलेले नेते  असल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ निधी नसल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. सत्तांतर झाल्यानंतरही आजपर्यंत नदी सुधारकडे दुर्लक्ष झाले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही. तसेच तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर पिंपरी-चिंचवडकरांवर आणि सत्ताधा-यांवर फोडले होते. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार यांनी याबाबत अधिवेशनात आवाजही उठविला होता. 

आता गती मिळणार

अत्यंत कार्यक्षम आणि बोले तैसा चाले अशी नितीन गडकरी यांची ख्याती आहे. त्यामुळे नदी सुधारबाबतचे खाते गडकरी यांच्यावर सोपविले आहे. त्यामुळे नदीसुधारप्रकल्पाला चालना मिळणार अशी खात्री शहरातील नितीन गडकरी यांच्या गटाला आहे. त्यामुळे गडकरी यांच्या दौ-याची उत्सुकता सत्ताधा-यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनाही आहे. याबाबत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी नदी सुधारला प्राधान्य दिले नाही. केवळ ठराव, प्रस्ताव करून फायदा काय? पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्याचा विचार नदीसुधारमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. गडकरी यांनी नुकताच नद्यासंदर्भातील खात्याचा पदभार स्विकारला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील सीआयआरटीमधील एका कार्यक्रमास ते येणार आहेत. त्यामुळे नदीसुधारविषयी आग्रह करणार आहे. नदी सुधारसाठी केंद्राने निधी द्यावा, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे आता या कामास गती मिळेल, अशी आशा आहे.’’