शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारला मिळणार का गती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:27 IST

पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे.

विश्वास मोरे पिंपरी, दि. 7 - पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधारविषयी राजकीय मानसिकता नसल्याने नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदी सुधार आणि गंगा नदीसुधार हेही खात्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणीनदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधा-यांना आहे. त्यामळे नदीसुधारला गती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतून तीन नद्या वाहतात. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून आणि पवना ही नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. शहराची लोकसंख्या ही बावीस लाखांवर पोहोचली आहे. मुळा आणि इंद्रायणी नदीच्या तुलनेत पवना नदीचे प्रदूषण अधिक आहे, असा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल सांगतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, शहरातील औद्योगिक परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते. शहरामध्ये छोटे-मोठे सुमारे साडेसहा हजार उद्योग आहेत. तसेच हजारो लघुउद्योग सुरू आहेत. जलनिस्सारण अर्थात एसटीपी प्लांट उभारूनही केवळ ८० टक्केंच पाणी प्रक्रिया केले जाते. उर्वरित पाणी तसेच नदीत सोडले जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. नदीप्रदूषणाबाबत महापालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण करण्यांवर अजूनही कडक कारवाई झालेली नाही.

आघाडी सरकारला अपयश

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालखंडात पवना नदीसुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पदाधिका-यांनी गुजरात येथील प्रकल्पांची पाहणी करून संबंधित आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर केला होता. पर्यावरण विषयक जाण नसलेले नेते  असल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ निधी नसल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. सत्तांतर झाल्यानंतरही आजपर्यंत नदी सुधारकडे दुर्लक्ष झाले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, त्यावर ठोस असा निर्णय झाला नाही. तसेच तीन महिन्यांपूर्वी आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर पिंपरी-चिंचवडकरांवर आणि सत्ताधा-यांवर फोडले होते. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार यांनी याबाबत अधिवेशनात आवाजही उठविला होता. 

आता गती मिळणार

अत्यंत कार्यक्षम आणि बोले तैसा चाले अशी नितीन गडकरी यांची ख्याती आहे. त्यामुळे नदी सुधारबाबतचे खाते गडकरी यांच्यावर सोपविले आहे. त्यामुळे नदीसुधारप्रकल्पाला चालना मिळणार अशी खात्री शहरातील नितीन गडकरी यांच्या गटाला आहे. त्यामुळे गडकरी यांच्या दौ-याची उत्सुकता सत्ताधा-यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनाही आहे. याबाबत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी नदी सुधारला प्राधान्य दिले नाही. केवळ ठराव, प्रस्ताव करून फायदा काय? पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्याचा विचार नदीसुधारमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. गडकरी यांनी नुकताच नद्यासंदर्भातील खात्याचा पदभार स्विकारला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील सीआयआरटीमधील एका कार्यक्रमास ते येणार आहेत. त्यामुळे नदीसुधारविषयी आग्रह करणार आहे. नदी सुधारसाठी केंद्राने निधी द्यावा, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे आता या कामास गती मिळेल, अशी आशा आहे.’’