शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रुग्णांना निकृष्ट औषधे!, दुकानांची तपासणी न करताच दिले परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:51 IST

राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते

मुंबई : राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) अहवालात व्यक्त करण्यात आली असून, अन्न व औषधी प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत.‘कॅग’चा हा अहवाल बुधवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. बाजारात औषधांचा साठा येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र, सरकारच्या अखत्यारित असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही गुणवत्ता तपासली गेली नाही. या विभागाने १,५३५ औषध विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणीच केली नाही, तर १,२८६ औषध विक्रेत्यांना तपासणीविनाच परवान्यांचे वाटप करण्यात आले.राज्यातील औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सिरप,गोळ्या, इंजेक्शनसारख्या महत्त्वाच्या ९२ औषधांच्या तपासणीत ती कमी मानांकनाची असल्याचे आढळून येऊनही, त्या औषधांचा पुरवठा बाजारात होऊन त्याची विक्री झाली. अन्न व औषध प्रशासन विभागात असलेले अपुरे मनुष्यबळ, अपुºया प्रयोगशाळा आणि यंत्र सामग्री व कामकाज पद्धतीवर कॅगने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.कमी मानांकनाची औषधांची विक्री केल्याबद्दल या विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणतीच कारवाई केली नाही वा उत्पादने बाजारातून मागे घेतली नाहीत.गुटखा, पानमसाला सारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना, त्याची विक्री करताना तो माल जप्त केला खरा. मात्र, त्याची तपासणी केली नाही. अनेक सौदर्य प्रसाधनांच्या मानांकनाची तपासणीही करण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परवान्यांचा घोळ असलेल्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा होऊन, जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कॅगने वर्तविली.

टॅग्स :medicinesऔषधं