शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी मार्गस्थ

By admin | Updated: June 29, 2016 01:26 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले.

पिंपरी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ सुंदर अर्थात निर्मल वारीचा संकल्प झाला. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी पाचला उद्योगनगरीत प्रवेशिला. वरुणाचा अभिषेक आणि उद्योगनगरीने वैष्णवांच्या मेळ््याचे मनोभावे स्वागत केले.ऊन-सावलीचा खेळ, अधून-मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात विठुनामाचा गजर करीत पालखी सोहळा वारीची वाट चालू लागला आहे. इनामदारवाड्यातील आजोळघरी मुक्काम करून मंगळवारी सकाळी अकराला सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी सकाळी साडेआठला आजोळघरी इनामदारवाड्यात जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक मोरे, बीडीओ संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, हवेलीचे तहसीलदार किरणकुमार काकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, देहूगावच्या सरपंच हेमा मोरे आदी उपस्थित होत्या. महापूजेनंतर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगानुसार वैष्णवांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडला. गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणपूरक, स्वच्छ, सुंदर निर्मल वारीचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर देहूकरांचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बसरत होत्या. त्यामुळे वैष्णवांच्या भक्तीचा रंग अधिकच गहिरा होत होता. प्रवेशद्वारावर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनगडशाहवलीबाबा दर्गा येथे दुपारचा विसावा झाला. पहिल्या अभंगआरतीनंतर पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने निघाला. दुपारी अडीचच्यादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस असतानाही वारकऱ्यांच्या उत्साहात तसूरभरही कमतरता जाणवली नाही. चिंचोली, देहूरोडमध्ये लष्करी जवानांच्या वतीने ब्रिगेडियर देवेन पटेल यांनी दिंडीप्रमुखांचे स्वागत केले. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि सीओडी आणि डीओडीच्या कामगारांनी वारकऱ्यांची सेवा केला. त्यानंतर पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झाला. दुसरीकडे पालखी सोहळा अनुभवण्यासाठी निगडी भक्ती-शक्ती चौक येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जमलेले होते. उद्योगनगरीतून महापालिका, प्राधिकरण आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कक्ष उभारलेले होते. ध्वनिक्षेपकावर विठ्ठलभक्तीचा महिमा सांगणारी गीते सुरू होती. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास नगारा आणि चौघडा उद्योगनगरीत प्रवेशिला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास रथ आला. तिथे शहराच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. या वेळी विविध शाळांची दिंडी पथके सहभागी झाली होती. तसेच पोलीसमित्र संघटनेचे कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसादवाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पलदुरुस्ती, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या. त्यानंतर सोहळा निगडी टिळक चौकमार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचला. अभंगारतीनंतर सोहळा विसावला. बुधवारी पहाटे साडेसहाला सोहळा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा त्यानंतर दापोडीत दुपारचा विसावा होणार असून, बोपोडी, खडकी, वाकडेवाडीमार्गे सोहळा पुण्यात मुक्कामासाठी थांबणार आहे. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सायंकाळी पाचला प्रवेशिला.