शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पानसरेंच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

कायदा व सुव्यवस्था ढासळली : डॉ. विश्वजित कदम

कडेगाव : कॉम्रेड गोविंदराव पानसरेंची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना आणि त्यामागील सूत्रधारांना शोधून कठोर शिक्षा दिली पाहिजे. कॉ. पानसरे पुरोगामी विचारांचे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचे कणखर नेतृत्व होते. त्यांचे विचार जोपासण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांवर हल्ला करणारी विकृत प्रवृत्ती शोधली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, मी मदत व पुनर्वसनमंत्री असताना टंचाई उपाययोजना निधीतून टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेची आवर्तने दिली होती. यासाठी निधीचीही तरतूद केली होती. आता नव्या सरकारने अद्याप निधी देण्यास विलंब केला आहे. संबंधित आयुक्तांनी ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे सांगितले आहे. आता हा निधी प्राप्त होईल. परंतु यापुढे टंचाई काळात अशी आवर्तने मिळतात का ते पाहा, असा टोलाही त्यांनी लगावला. डॉ. कदम म्हणाले, आता कडेगाव नगरपरिषद होणार आहे. शासनाचा निर्णय एकदा झाला की शक्यतो बदलत नाही. ५ मार्चपर्यंत हरकतींची मुदत असली तरी, हरकती घेऊन काही उपयोग होत नाही. कडेगाव नगरपरिषद होणार हे निश्चित आहे. (वार्ताहर)

कायदा व सुव्यवस्था ढासळली : डॉ. विश्वजित कदमप्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या हे सामाजिक व्यवस्थेला लागलेले गालबोट आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. अन्य व्यापातून गृहखात्यासाठी त्यांना वेळ देता येत नसेल, तर त्यांनी ते अन्य व्यक्तीकडे द्यावे. आगामी अधिवेशनात प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था आणि शासनाचा अनागोंदी कारभार याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.