शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

प्रवाशांचा जीव टांगणीलाच !

By admin | Updated: February 27, 2015 02:13 IST

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलमधून पडून रोज सुमारे १०-१२ जणांना अपघात होतो. त्यात अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना कायमस्वरूपी

मुंबई : मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलमधून पडून रोज सुमारे १०-१२ जणांना अपघात होतो. त्यात अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. रेल्वेची चूक असल्याचे सिद्ध झाल्यावरही वारसांना भरपाईसाठी झगडावे लागते. पण यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने यावर कोणताही उपाय सुचवलेला नाही. या मुद्द्यावर उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे कायदे सल्लागार आणि पश्चिम रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी अ‍ॅड. दत्तात्रय गोडबोले यांनी ‘लोकमत’शी केलेली बातचीत. जर एखादा प्रवासी गाडीच्या फूट बोर्डवरून पडला किंवा गाडीत चढताना/उतरताना पडला, मरण पावला किंवा गंभीर जखमी झाला तर त्याच्या वारसास भरपाई मागण्याचा अधिकार रेल्वे अधिनियमाच्या कलम १२३(२) व १२४ने दिला आहे. रेल्वे प्रशासनाने एका बिलाद्वारे हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोकसभेपुढे आले तेव्हा सर्व खासदारांनी त्याला विरोध केला. त्यामुळे ते संसदेच्या रेल्वेसाठीच्या स्थायी समतीला पाठवून देण्यात आले. या समितीने मुंबईत येऊन काही मान्यवरांच्या भेटीही घेतल्या. प्रवासी संघटनांच्या केवळ काही मोजक्याच प्रतिनिधींना त्यासाठी बोलाविले होते. त्यांनी या बिलास ठाम विरोध केला आहे.पोर्ट ट्रस्टची जागा मिळवावीरेल्वे कुर्ला व मुंबईच्या मध्ये पाचवा व सहावा मार्ग बांधणार आहे. त्यासाठी फार मोठी व्यापारी तसेच रहिवासी जागा मिळवणार आहे. त्यासाठी रेल्वेस फार मोठी नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. त्याऐवजी जर मुंबई पोर्ट ट्रस्टची त्या भागातील जागा मिळविली तर ती स्वस्तात मिळू शकेल. लांब पल्ल्याच्या गाड्या तेथून नेता येतील. वेळही फार कमी लागेल. परंतु सरकार त्यासाठी तयार दिसत नाही. आम्ही पाठवलेल्या पत्राला केराच्या टोपली दाखवल्याचे दिसते.कर्जत-पनवेल दुहेरीकरणाकडे दुर्लक्षसध्या कर्जत-पनवेल हा सुमारे १८ ते २० किलोमीटरचा रेल्वे मार्ग एकेरीच आहे. त्यामुळे रेल्वे त्या मार्गावर उपनगरीय गाड्या चालवित नाहीत. दुसरे कारण असे सांगितले जाते की त्या मार्गावर बऱ्याच मालगाड्या चालतात. परंतु गेल्या १० वर्षांत तो मार्ग दुहेरी करण्याचे काम रेल्वेने अग्रक्रमाने केलेले नाही. इतर ठिकाणीही नवीन रेल्वे मार्गांची कामे अर्धवट आहेत. तिथेसुद्धा गाड्या सुरू केलेल्या नाहीत. २० किमीचे काम सात-आठ महिन्यांत पूर्ण करता येईल. जर तसे करून कर्जत-पनवेल मार्ग दुहेरी केला तर तिथे दुप्पट गाड्या चालवता येतील. आता त्यास मंजुरी दिली आहे, परंतु त्याची पूर्तता लवकर होणे महत्त्वाचे आहे.> अ‍ॅड. दत्तात्रय गोडबोलेउपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे कायदे सल्लागार फलाटांना एकच कंत्राटदारफलाटांची उंची वाढविण्यासाठी रेल्वेजवळ एकच कंत्राटदार असल्याचे दिसते. जोपर्यंत रेल्वे प्रशासनाविरुद्ध काही दंडात्मक कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षी प्रवासी असेच मारले जाणार व रेल्वेस त्याचे काही सोयरसुतक राहणार नाही.