शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अस्वच्छतेने प्रवासी होताहेत त्रस्त

By admin | Updated: January 16, 2017 01:52 IST

पिंपरी स्टेशनची गणना होत असली तरी हे स्टेशन नियोजनाअभावी अस्वच्छता व असुविधांच्या गर्तेने पिंपरी स्टेशनला व्यापलेले आहे.

काळेवाडी : शहरातील मध्यवर्ती स्टेशन म्हणून पिंपरी स्टेशनची गणना होत असली तरी हे स्टेशन नियोजनाअभावी अस्वच्छता व असुविधांच्या गर्तेने पिंपरी स्टेशनला व्यापलेले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून फूटपाथ व इतर दुरुस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत्त आहे.या स्थानकावर प्रवाशांसाठी बांधलेल्या स्वच्छ्तागृहाची अवस्था अतिशय गलिच्छ असून त्याची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे इमर्जन्सी म्हणूनही त्याकडे डोकावण्यास कोणत्याही प्रवाशांना इच्छा होत नाही. तसेच या स्टेशनवर दारु पिऊन भटकत फिरणारे टवाळखोर व भिकारी यांची हक्काची जागा म्हणून ते या स्टेशनवर मोकाट फिरत असतात. त्यामुळे विद्यार्थिनी व स्त्रियांना या टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक वेळा रेल्वे रुळावरील ओव्हरब्रिजवर काही आंबटशौकीन तरुण व तरुणी दंगामस्ती करताना दिसून येत आहेत. >भुरट्या चोरांचा उपद्रवया स्टेशनच्या परिसरात जवळच पिंपरीतील बाजारपेठ व भाजी मंडई असल्यामुळे या स्टेशनवर नेहमीच स्त्री-पुरुष प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेण्यासाठी पाकीट मारणाऱ्या भुरट्या चोरांचाही उपद्रव अनेकवेळा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. स्टेशनच्या बाजूलाच झोपडपट्टी असल्यामुळे रात्रीच्या वेळी बाजूने दगड मारण्याचे प्रकार घडत असल्यामुळे येथील रेल्वे पोलीसही या टवाळखोरांना हटकण्याचे धाडस करण्यास धजावत नाहीत. या स्टेशनवर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर नेहमीच अनधिकृत रिक्षा, हातगाड्या व दुचाकी पार्क केलेल्या असतात.>प्रवेशद्वारावर अतिक्रमणनागरिकांच्या सोयीस्कर असणाऱ्या रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या असल्यामुळे दूध,भाजीवाले व अनेक प्रवासी घाई-गडबडीने धोकादायक पद्धतीने लोखंडी जाळीवर चढून जवळचा मार्ग स्वीकारत असतात. तसेच अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रूळही ओलांडत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यताही दाट असते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसार व वाढणाऱ्या गर्दीनुसार लोकल गाड्यांची संख्याही वाढली पाहिजे. तसेच स्टेशनवरील सोई-सुविधा सुधारून स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे अशी सर्व प्रवासी वर्गांचीही मागणी आहे. >स्वच्छतागृहाची देखभाल नाहीपिंपरी रेल्वे स्थानक हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी मध्यवर्ती स्थानक आहे. येथून मुंबई, लोणावळा, पुणे या भागात जाण्यासाठी कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील असते. मात्र या स्थानकावरील स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. शिवाय स्थानकावर भिकारी, गर्दुले व टवाळखोरांची वर्दळ असते. त्यामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत असते. पोलिसांकडून यांवर कारवाई करण्यास कुचराई केली जात असते.