शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

रेल्वेकडून प्रवाशांची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:59 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया या दोन्ही यंत्रणांकडून प्रवाशांच्या सुरक्षेची फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे जुईनगर व सानपाडासारखी इतरही स्थानके जुगारींसह गर्दुल्ले व तृतीयपंथींचा अड्डा बनली आहेत. रात्रीच्या वेळी नशा करून ते रेल्वेत गुन्हेगारी कारवाया करत असतात. अशा वेळी महिला डब्यात पोलीस नेमलेले असतानाही त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.

- सूर्यकांत वाघमारे रेल्वेमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. लोकलने प्रवास करणाºया चाकरमान्यांना डब्यात चढताना अथवा उतरताना किंवा स्थानकातील गर्दीतून वाट काढताना रोज नवनवीन प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच लुटीच्या उद्देशाने होणारे हल्ले प्रवाशांच्या जिवावर बेतत असून, अशा घटनांमध्ये गुन्हेगारांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे; परंतु सुरक्षेच्या बाबतीत कुचकामी ठरलेल्या रेल्वे प्रशासनाचे त्याकडे लक्ष जाईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रवासाचे सर्वांत मोठे जाळे व्यापणारी लोकल मुंबईची नस मानली जाते. वेळ व पैशांच्या बचतीसाठी कामानिमित्ताने रोजचा लोकल प्रवास करणाºयांची संख्या लाखोंच्या घरात आहे; परंतु हाच रेल्वेप्रवास या ना त्या कारणाने अनेकांना त्रासदायक ठरत आहे. रेल्वे स्थानक व भोवतालच्या सुविधांच्या अभावामुळे वाढती गुन्हेगारी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य उभे आहे. त्या ठिकाणचे तरुण फावल्या वेळेत प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे तरुण स्थानकातील आडोशाच्या जागी, मोकळ्या डब्यात प्रवाशांवर हल्ले करून लुटत आहेत; तर चालत्या लोकलमध्ये लुटीच्या उद्देशाने महिलांवर होणारे हल्ले रोजचेच झाले आहेत. जुईनगर, सानपाडा व इतर स्थानकांमध्ये असे अनेक गुन्हे घडले आहेत. अनेकदा प्रवासी त्यांना प्रतिकारही करतात. मात्र, वेळेवर पोलिसांची मदत मिळत नसल्याने हे गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांना ‘शक्ती मिल’सारख्या गँग रेपच्या घटना घडण्याचीच प्रतीक्षा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मागील आठवड्यात वाशीतील विद्यार्थिनीला चोरट्याने रेल्वेतून ढकलून पळ काढला. या तरुणाची ओळख पटली असली तरीही त्याला अद्याप अटक झालेली नाही. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा तपास जीआरपी आणि आरपीएफ यांच्या श्रेयवादात फसल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे २०१४ साली रत्नागिरी येथून ऐरोली येथील घरी जाणाºया तुषार जाधव या अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेत हत्या झाली होती. कोकण रेल्वेने पनवेलला उतरल्यानंतर तो पहाटेच्या पहिल्या लोकलने ऐरोलीकडे जात होता. या वेळी दोघा लुटारूंनी रेल्वेच्या डब्यात त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून, लुटून पळ काढला होता. यानंतरही प्रवाशांवर हल्ले करून लुटीच्या घटना सुरूच असल्याने जीआरपी व आरपीएफ यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बहुतांश स्थानकांमध्ये सीसीटीव्ही केवळ नावालाच बसवलेले आहेत. काही सीसीटीव्ही बंद असून, जे चालू आहेत ते दर्जामुळे कामचलाऊ ठरत आहेत. तर एखादी दुर्घटना चित्रित होऊनही गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडल्याची संतप्त भावना रेल्वे प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल