शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून प्रवाशांची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:59 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया या दोन्ही यंत्रणांकडून प्रवाशांच्या सुरक्षेची फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे जुईनगर व सानपाडासारखी इतरही स्थानके जुगारींसह गर्दुल्ले व तृतीयपंथींचा अड्डा बनली आहेत. रात्रीच्या वेळी नशा करून ते रेल्वेत गुन्हेगारी कारवाया करत असतात. अशा वेळी महिला डब्यात पोलीस नेमलेले असतानाही त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.

- सूर्यकांत वाघमारे रेल्वेमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. लोकलने प्रवास करणाºया चाकरमान्यांना डब्यात चढताना अथवा उतरताना किंवा स्थानकातील गर्दीतून वाट काढताना रोज नवनवीन प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच लुटीच्या उद्देशाने होणारे हल्ले प्रवाशांच्या जिवावर बेतत असून, अशा घटनांमध्ये गुन्हेगारांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे; परंतु सुरक्षेच्या बाबतीत कुचकामी ठरलेल्या रेल्वे प्रशासनाचे त्याकडे लक्ष जाईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रवासाचे सर्वांत मोठे जाळे व्यापणारी लोकल मुंबईची नस मानली जाते. वेळ व पैशांच्या बचतीसाठी कामानिमित्ताने रोजचा लोकल प्रवास करणाºयांची संख्या लाखोंच्या घरात आहे; परंतु हाच रेल्वेप्रवास या ना त्या कारणाने अनेकांना त्रासदायक ठरत आहे. रेल्वे स्थानक व भोवतालच्या सुविधांच्या अभावामुळे वाढती गुन्हेगारी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य उभे आहे. त्या ठिकाणचे तरुण फावल्या वेळेत प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे तरुण स्थानकातील आडोशाच्या जागी, मोकळ्या डब्यात प्रवाशांवर हल्ले करून लुटत आहेत; तर चालत्या लोकलमध्ये लुटीच्या उद्देशाने महिलांवर होणारे हल्ले रोजचेच झाले आहेत. जुईनगर, सानपाडा व इतर स्थानकांमध्ये असे अनेक गुन्हे घडले आहेत. अनेकदा प्रवासी त्यांना प्रतिकारही करतात. मात्र, वेळेवर पोलिसांची मदत मिळत नसल्याने हे गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांना ‘शक्ती मिल’सारख्या गँग रेपच्या घटना घडण्याचीच प्रतीक्षा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मागील आठवड्यात वाशीतील विद्यार्थिनीला चोरट्याने रेल्वेतून ढकलून पळ काढला. या तरुणाची ओळख पटली असली तरीही त्याला अद्याप अटक झालेली नाही. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा तपास जीआरपी आणि आरपीएफ यांच्या श्रेयवादात फसल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे २०१४ साली रत्नागिरी येथून ऐरोली येथील घरी जाणाºया तुषार जाधव या अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेत हत्या झाली होती. कोकण रेल्वेने पनवेलला उतरल्यानंतर तो पहाटेच्या पहिल्या लोकलने ऐरोलीकडे जात होता. या वेळी दोघा लुटारूंनी रेल्वेच्या डब्यात त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून, लुटून पळ काढला होता. यानंतरही प्रवाशांवर हल्ले करून लुटीच्या घटना सुरूच असल्याने जीआरपी व आरपीएफ यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बहुतांश स्थानकांमध्ये सीसीटीव्ही केवळ नावालाच बसवलेले आहेत. काही सीसीटीव्ही बंद असून, जे चालू आहेत ते दर्जामुळे कामचलाऊ ठरत आहेत. तर एखादी दुर्घटना चित्रित होऊनही गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडल्याची संतप्त भावना रेल्वे प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल