शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

By admin | Updated: August 10, 2014 01:38 IST

वाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील

वेगाचा थरार नेतोय मृत्यूच्या जबड्यात योगेश पांडे - नागपूरवाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.विशेषत: रात्रीच्या सुमारास तर वेगावर नियंत्रण राहतच नाही. उपराजधानीमध्ये बाहेर जाऊन ‘पार्टी’ साजरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तरुणाईमध्ये तर हा ‘वीकली ट्रेन्ड’ झाला आहे. परंतु २०१३ या वर्षात याच ‘पार्टीटाईम’मध्ये म्हणजेच रात्री ९ ते १२ या वेळेत चक्क २४० अपघातांची नोंद करण्यात आली. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. अपघातांचे हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे.साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ होते. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत वर्षभरात झालेल्या २४० अपघातांपैकी अनेक अपघात प्राणांतिक ठरले. ‘ड्रंकन ड्राईव्ह‘मध्ये त्रुटीशहरात ‘ड्रंकन ड्राईव्ह’ ही मोहीम धडाक्यात राबविली जाते. या मोहिमेनुसार, अवघ्या सात महिन्यात (जानेवारी ते जुलै २०१४) पोलिसांनी ७५०० केसेस केल्या आहेत. त्यातून दंडापोटी ८० लाखांचा महसूलही गोळा केलेला आहे. नाही म्हणायला दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना त्यामुळे आळा बसतोच. मात्र, ही मोहीम चांगली असली तरी त्यात तीन प्रमुख त्रुटी आहेत. या त्रुटींपैकी एक म्हणजे, पोलीस केवळ रात्री ९ वाजेपर्यंतच मोहीम राबवतात. दुसरे म्हणजे, वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारवाईचा स्पॉट केवळ बार आणि वाईन शॉपजवळच असतो. तिसरी आणि महत्त्वाची त्रुटी म्हणजे पोलीस केवळ दुचाकी चालकांनाच (अपवाद एखादा कारवाला!) पकडतात. कार आणि आलिशान वाहनातून दारू-सिगारेट पित निघालेल्या वाहनचालकांना रोखण्याची हिंमत पोलीसदादा दाखवत नाहीत. त्यामुळे शहरातील लाऊंज, क्लब आणि हॉटेलमधून झिंगत बाहेर पडणाऱ्यांवर कोणताच वचक नाही. ही मंडळी वाहनातून नको ते वर्तन करीत सुसाट वेगाने रस्त्यावरून दौडते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या हातून निरपराध चिरडले जातात. रात्रीची वेळ असल्यामुळे निरपराधाचा जीव घेणारे किंवा कुणाला दुखापत करणारे ‘ते’ कुणाच्या नजरेतही येत नाही. ‘कुछ नही होता’ अशी त्यांची भावना झाल्यामुळे पुन्हा ते दुसऱ्या रात्री झिंगण्यासाठी सज्ज असतात. शंभराहून अधिक तरुणांचा बळी‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१३ या वर्षात उपराजधानीत १,३८१ अपघातांची नोंद झाली व यात ३४१ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तसेच अपघातांना कारणीभूत असलेल्यांमध्ये ३० वर्षांपर्यंतच्या तरुणाईचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे १०० इतके आहे. वाहन चालविताना अतिउत्साह, उन्माद अन् बेजबाबदारपणा यांच्यामुळे नागपुरातील रस्ते ‘किलर झोन’ ठरत आहेत.