शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

By admin | Updated: August 10, 2014 01:38 IST

वाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील

वेगाचा थरार नेतोय मृत्यूच्या जबड्यात योगेश पांडे - नागपूरवाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.विशेषत: रात्रीच्या सुमारास तर वेगावर नियंत्रण राहतच नाही. उपराजधानीमध्ये बाहेर जाऊन ‘पार्टी’ साजरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तरुणाईमध्ये तर हा ‘वीकली ट्रेन्ड’ झाला आहे. परंतु २०१३ या वर्षात याच ‘पार्टीटाईम’मध्ये म्हणजेच रात्री ९ ते १२ या वेळेत चक्क २४० अपघातांची नोंद करण्यात आली. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. अपघातांचे हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे.साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ होते. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत वर्षभरात झालेल्या २४० अपघातांपैकी अनेक अपघात प्राणांतिक ठरले. ‘ड्रंकन ड्राईव्ह‘मध्ये त्रुटीशहरात ‘ड्रंकन ड्राईव्ह’ ही मोहीम धडाक्यात राबविली जाते. या मोहिमेनुसार, अवघ्या सात महिन्यात (जानेवारी ते जुलै २०१४) पोलिसांनी ७५०० केसेस केल्या आहेत. त्यातून दंडापोटी ८० लाखांचा महसूलही गोळा केलेला आहे. नाही म्हणायला दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना त्यामुळे आळा बसतोच. मात्र, ही मोहीम चांगली असली तरी त्यात तीन प्रमुख त्रुटी आहेत. या त्रुटींपैकी एक म्हणजे, पोलीस केवळ रात्री ९ वाजेपर्यंतच मोहीम राबवतात. दुसरे म्हणजे, वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारवाईचा स्पॉट केवळ बार आणि वाईन शॉपजवळच असतो. तिसरी आणि महत्त्वाची त्रुटी म्हणजे पोलीस केवळ दुचाकी चालकांनाच (अपवाद एखादा कारवाला!) पकडतात. कार आणि आलिशान वाहनातून दारू-सिगारेट पित निघालेल्या वाहनचालकांना रोखण्याची हिंमत पोलीसदादा दाखवत नाहीत. त्यामुळे शहरातील लाऊंज, क्लब आणि हॉटेलमधून झिंगत बाहेर पडणाऱ्यांवर कोणताच वचक नाही. ही मंडळी वाहनातून नको ते वर्तन करीत सुसाट वेगाने रस्त्यावरून दौडते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या हातून निरपराध चिरडले जातात. रात्रीची वेळ असल्यामुळे निरपराधाचा जीव घेणारे किंवा कुणाला दुखापत करणारे ‘ते’ कुणाच्या नजरेतही येत नाही. ‘कुछ नही होता’ अशी त्यांची भावना झाल्यामुळे पुन्हा ते दुसऱ्या रात्री झिंगण्यासाठी सज्ज असतात. शंभराहून अधिक तरुणांचा बळी‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१३ या वर्षात उपराजधानीत १,३८१ अपघातांची नोंद झाली व यात ३४१ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तसेच अपघातांना कारणीभूत असलेल्यांमध्ये ३० वर्षांपर्यंतच्या तरुणाईचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे १०० इतके आहे. वाहन चालविताना अतिउत्साह, उन्माद अन् बेजबाबदारपणा यांच्यामुळे नागपुरातील रस्ते ‘किलर झोन’ ठरत आहेत.