शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

By admin | Updated: August 10, 2014 01:38 IST

वाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील

वेगाचा थरार नेतोय मृत्यूच्या जबड्यात योगेश पांडे - नागपूरवाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.विशेषत: रात्रीच्या सुमारास तर वेगावर नियंत्रण राहतच नाही. उपराजधानीमध्ये बाहेर जाऊन ‘पार्टी’ साजरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तरुणाईमध्ये तर हा ‘वीकली ट्रेन्ड’ झाला आहे. परंतु २०१३ या वर्षात याच ‘पार्टीटाईम’मध्ये म्हणजेच रात्री ९ ते १२ या वेळेत चक्क २४० अपघातांची नोंद करण्यात आली. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. अपघातांचे हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे.साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ होते. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत वर्षभरात झालेल्या २४० अपघातांपैकी अनेक अपघात प्राणांतिक ठरले. ‘ड्रंकन ड्राईव्ह‘मध्ये त्रुटीशहरात ‘ड्रंकन ड्राईव्ह’ ही मोहीम धडाक्यात राबविली जाते. या मोहिमेनुसार, अवघ्या सात महिन्यात (जानेवारी ते जुलै २०१४) पोलिसांनी ७५०० केसेस केल्या आहेत. त्यातून दंडापोटी ८० लाखांचा महसूलही गोळा केलेला आहे. नाही म्हणायला दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना त्यामुळे आळा बसतोच. मात्र, ही मोहीम चांगली असली तरी त्यात तीन प्रमुख त्रुटी आहेत. या त्रुटींपैकी एक म्हणजे, पोलीस केवळ रात्री ९ वाजेपर्यंतच मोहीम राबवतात. दुसरे म्हणजे, वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारवाईचा स्पॉट केवळ बार आणि वाईन शॉपजवळच असतो. तिसरी आणि महत्त्वाची त्रुटी म्हणजे पोलीस केवळ दुचाकी चालकांनाच (अपवाद एखादा कारवाला!) पकडतात. कार आणि आलिशान वाहनातून दारू-सिगारेट पित निघालेल्या वाहनचालकांना रोखण्याची हिंमत पोलीसदादा दाखवत नाहीत. त्यामुळे शहरातील लाऊंज, क्लब आणि हॉटेलमधून झिंगत बाहेर पडणाऱ्यांवर कोणताच वचक नाही. ही मंडळी वाहनातून नको ते वर्तन करीत सुसाट वेगाने रस्त्यावरून दौडते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या हातून निरपराध चिरडले जातात. रात्रीची वेळ असल्यामुळे निरपराधाचा जीव घेणारे किंवा कुणाला दुखापत करणारे ‘ते’ कुणाच्या नजरेतही येत नाही. ‘कुछ नही होता’ अशी त्यांची भावना झाल्यामुळे पुन्हा ते दुसऱ्या रात्री झिंगण्यासाठी सज्ज असतात. शंभराहून अधिक तरुणांचा बळी‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१३ या वर्षात उपराजधानीत १,३८१ अपघातांची नोंद झाली व यात ३४१ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तसेच अपघातांना कारणीभूत असलेल्यांमध्ये ३० वर्षांपर्यंतच्या तरुणाईचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे १०० इतके आहे. वाहन चालविताना अतिउत्साह, उन्माद अन् बेजबाबदारपणा यांच्यामुळे नागपुरातील रस्ते ‘किलर झोन’ ठरत आहेत.