शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

By admin | Updated: October 23, 2016 23:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून, भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 23  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून,  भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष बनू लागला आहे. त्यांच्याकडून काय भ्रष्टाचार आणि भयमुक्त शहराची अपेक्षा करायची. शाहू-फुलेंचा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. 
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने दापोडीत आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव भाऊसाहेब भोईर, महिलाध्यक्षा ज्योती भारती, विरोधी पक्षनेते राहुल भोसले, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे आदी उपस्थित होते. 
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर राणे यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ‘‘आश्वासनांचा पाऊस पाडणा-या भाजपाचा पंचनामा करायला मी येथे आलो आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार अशा सर्वच घटकांतील नागरिक बेजार झाले आहेत. कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कोठे गेले अच्छे दिन? दोन वर्षांत काय दिवे लावले आता पुढील तीन वर्षांत लावाल. डिजिटल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न दाखविणा-या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकाही गावासाठी एकही संगणक खरेदी केला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये एकतरी काम दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा. थापा मारणारा मुख्यमंत्री आहे. शासनाच्या वेतनावर मुख्यमंत्री कार्यालयातही आरएसएसची माणसे काम करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक सेल उघडला आहे. पुण्याचे पालकमंत्री बापट, काकडे-वाकडे त्या गुंडांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. पालकमंत्री नव्हेत, ते डाळमंत्री आता गुंडांना पक्षात घेत आहेत. गुुन्हेगारांना प्रवेश दिल्याने दानवेंची दाणादाण उडाली आहे.
 
स्मार्ट सिटीतही डावलले-
स्मार्ट सिटी योजनेत पिंपरीला डावलले. त्यातही राजकारण केले. दोन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले आहे. उर्वरित तीन वर्षांत हा महाराष्टÑ दहा वर्षांनी मागे गेल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका राणे यांनी केली.
 
मराठा आरक्षणाबाबत चेष्टा करू नये-
राणे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत कार्यालयात एक, बाहेर आणि पत्रकार परिषदेत एक बोलत आहेत. आजवर इतर समाजाने आरक्षणासाठी मागणी केली, मोर्चे काढले; त्या वेळी मराठा समाजाने कधीही प्रतिमोर्चा काढलेला नव्हता. मात्र, प्रतिमोर्चे निघत आहेत. दि. १४ नोव्हेंबर २०१४ नंतर १८ महिन्यांत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, हे काय दर्शविते? मराठा किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणास धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबत भावना ओळखून चेष्टा करू नये.’’
 
३२ प्रभांगाची तयारी करा-
हर्षवर्धन पाटील यांनी सत्ताधारी राष्टÑवादीवर टीका केली. पाटील म्हणाले, ‘‘विविध पुलांचे, बीआरटी रस्त्याचे उद्घाटन करून श्रेय घेतले जात आहे. जेएनयूआरएमचा निधी कोणी आणला होता. काँग्रेसची साथ रुचत नसणारेच आघाडीची भाषा करीत आहेत. विधान परिषदेसाठी पाच-एक अशी चर्चा होत आहे. त्याऐवजी तीन-तीन जागा अशी बोलणी व्हायला हवीत. महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांची तयारी करा. ‘एकला चलो’चा नारा देण्याची गरज आहे. सत्तेसाठी सतत पक्ष बदलणारे येथील स्वार्थी आमदार जिथे सत्ता तिथे असू अशी त्यांची भूमिका आहे. सत्ता आल्यास महिनाभरात बांधकामे नियमित करू, असे सांगितले होते. दोन वर्षे झाली; कुठे गेले आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी केवळ क्लिन चीट देण्यापलीकडे काहीही काम केलेले नाही. पक्षातील वादविवाद, गट-तट सोडून काम करायला हवे.’’