शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

By admin | Updated: October 23, 2016 23:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून, भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 23  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून,  भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष बनू लागला आहे. त्यांच्याकडून काय भ्रष्टाचार आणि भयमुक्त शहराची अपेक्षा करायची. शाहू-फुलेंचा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. 
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने दापोडीत आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव भाऊसाहेब भोईर, महिलाध्यक्षा ज्योती भारती, विरोधी पक्षनेते राहुल भोसले, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे आदी उपस्थित होते. 
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर राणे यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ‘‘आश्वासनांचा पाऊस पाडणा-या भाजपाचा पंचनामा करायला मी येथे आलो आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार अशा सर्वच घटकांतील नागरिक बेजार झाले आहेत. कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कोठे गेले अच्छे दिन? दोन वर्षांत काय दिवे लावले आता पुढील तीन वर्षांत लावाल. डिजिटल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न दाखविणा-या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकाही गावासाठी एकही संगणक खरेदी केला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये एकतरी काम दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा. थापा मारणारा मुख्यमंत्री आहे. शासनाच्या वेतनावर मुख्यमंत्री कार्यालयातही आरएसएसची माणसे काम करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक सेल उघडला आहे. पुण्याचे पालकमंत्री बापट, काकडे-वाकडे त्या गुंडांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. पालकमंत्री नव्हेत, ते डाळमंत्री आता गुंडांना पक्षात घेत आहेत. गुुन्हेगारांना प्रवेश दिल्याने दानवेंची दाणादाण उडाली आहे.
 
स्मार्ट सिटीतही डावलले-
स्मार्ट सिटी योजनेत पिंपरीला डावलले. त्यातही राजकारण केले. दोन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले आहे. उर्वरित तीन वर्षांत हा महाराष्टÑ दहा वर्षांनी मागे गेल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका राणे यांनी केली.
 
मराठा आरक्षणाबाबत चेष्टा करू नये-
राणे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत कार्यालयात एक, बाहेर आणि पत्रकार परिषदेत एक बोलत आहेत. आजवर इतर समाजाने आरक्षणासाठी मागणी केली, मोर्चे काढले; त्या वेळी मराठा समाजाने कधीही प्रतिमोर्चा काढलेला नव्हता. मात्र, प्रतिमोर्चे निघत आहेत. दि. १४ नोव्हेंबर २०१४ नंतर १८ महिन्यांत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, हे काय दर्शविते? मराठा किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणास धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबत भावना ओळखून चेष्टा करू नये.’’
 
३२ प्रभांगाची तयारी करा-
हर्षवर्धन पाटील यांनी सत्ताधारी राष्टÑवादीवर टीका केली. पाटील म्हणाले, ‘‘विविध पुलांचे, बीआरटी रस्त्याचे उद्घाटन करून श्रेय घेतले जात आहे. जेएनयूआरएमचा निधी कोणी आणला होता. काँग्रेसची साथ रुचत नसणारेच आघाडीची भाषा करीत आहेत. विधान परिषदेसाठी पाच-एक अशी चर्चा होत आहे. त्याऐवजी तीन-तीन जागा अशी बोलणी व्हायला हवीत. महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांची तयारी करा. ‘एकला चलो’चा नारा देण्याची गरज आहे. सत्तेसाठी सतत पक्ष बदलणारे येथील स्वार्थी आमदार जिथे सत्ता तिथे असू अशी त्यांची भूमिका आहे. सत्ता आल्यास महिनाभरात बांधकामे नियमित करू, असे सांगितले होते. दोन वर्षे झाली; कुठे गेले आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी केवळ क्लिन चीट देण्यापलीकडे काहीही काम केलेले नाही. पक्षातील वादविवाद, गट-तट सोडून काम करायला हवे.’’