शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भाजपा गुंडांचा पक्ष - नारायण राणे

By admin | Updated: October 23, 2016 23:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून, भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 23  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सेल उघडला आहे त्यामध्ये खून, दरोडे टाकणा-यांना दररोज बोलावून प्रवेश दिला जात असून,  भ्रष्टाचार आणि भयमुक्त आश्वासन देणारा भाजपा हा पक्ष गुंडांचा पक्ष बनू लागला आहे. त्यांच्याकडून काय भ्रष्टाचार आणि भयमुक्त शहराची अपेक्षा करायची. शाहू-फुलेंचा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. 
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने दापोडीत आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव भाऊसाहेब भोईर, महिलाध्यक्षा ज्योती भारती, विरोधी पक्षनेते राहुल भोसले, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे आदी उपस्थित होते. 
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर राणे यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ‘‘आश्वासनांचा पाऊस पाडणा-या भाजपाचा पंचनामा करायला मी येथे आलो आहे. शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार अशा सर्वच घटकांतील नागरिक बेजार झाले आहेत. कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कोठे गेले अच्छे दिन? दोन वर्षांत काय दिवे लावले आता पुढील तीन वर्षांत लावाल. डिजिटल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न दाखविणा-या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकाही गावासाठी एकही संगणक खरेदी केला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये एकतरी काम दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा. थापा मारणारा मुख्यमंत्री आहे. शासनाच्या वेतनावर मुख्यमंत्री कार्यालयातही आरएसएसची माणसे काम करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक सेल उघडला आहे. पुण्याचे पालकमंत्री बापट, काकडे-वाकडे त्या गुंडांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. पालकमंत्री नव्हेत, ते डाळमंत्री आता गुंडांना पक्षात घेत आहेत. गुुन्हेगारांना प्रवेश दिल्याने दानवेंची दाणादाण उडाली आहे.
 
स्मार्ट सिटीतही डावलले-
स्मार्ट सिटी योजनेत पिंपरीला डावलले. त्यातही राजकारण केले. दोन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले आहे. उर्वरित तीन वर्षांत हा महाराष्टÑ दहा वर्षांनी मागे गेल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका राणे यांनी केली.
 
मराठा आरक्षणाबाबत चेष्टा करू नये-
राणे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत कार्यालयात एक, बाहेर आणि पत्रकार परिषदेत एक बोलत आहेत. आजवर इतर समाजाने आरक्षणासाठी मागणी केली, मोर्चे काढले; त्या वेळी मराठा समाजाने कधीही प्रतिमोर्चा काढलेला नव्हता. मात्र, प्रतिमोर्चे निघत आहेत. दि. १४ नोव्हेंबर २०१४ नंतर १८ महिन्यांत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, हे काय दर्शविते? मराठा किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणास धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबत भावना ओळखून चेष्टा करू नये.’’
 
३२ प्रभांगाची तयारी करा-
हर्षवर्धन पाटील यांनी सत्ताधारी राष्टÑवादीवर टीका केली. पाटील म्हणाले, ‘‘विविध पुलांचे, बीआरटी रस्त्याचे उद्घाटन करून श्रेय घेतले जात आहे. जेएनयूआरएमचा निधी कोणी आणला होता. काँग्रेसची साथ रुचत नसणारेच आघाडीची भाषा करीत आहेत. विधान परिषदेसाठी पाच-एक अशी चर्चा होत आहे. त्याऐवजी तीन-तीन जागा अशी बोलणी व्हायला हवीत. महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांची तयारी करा. ‘एकला चलो’चा नारा देण्याची गरज आहे. सत्तेसाठी सतत पक्ष बदलणारे येथील स्वार्थी आमदार जिथे सत्ता तिथे असू अशी त्यांची भूमिका आहे. सत्ता आल्यास महिनाभरात बांधकामे नियमित करू, असे सांगितले होते. दोन वर्षे झाली; कुठे गेले आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी केवळ क्लिन चीट देण्यापलीकडे काहीही काम केलेले नाही. पक्षातील वादविवाद, गट-तट सोडून काम करायला हवे.’’