शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन कर्मचार्‍यांचा ‘पूर्णकालीन’ भ्रमनिरास !

By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST

शासन शब्दाला जागत नाही: दिवसागणिक उलटत चालली वयोर्मयादा

वाशिम : गत २३ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर शासकीय कार्यालयांमध्ये राबणार्‍या अंशकालीन कर्मचार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन वेळोवेळी देणारे शासन शब्दाला जागले नाही. दुसरीकडे, नोकरीची वयोर्मयादा दिवसागणिक उलटत चालली असल्याने हे कर्मचारी दुहेरी विवंचनेत सापडले आहेत. १९९0-९१ साली राज्य शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांची संकल्पना जन्मास घातली. त्यानुसार पदवीधर बेरोजगारास महिन्याकाठी ३00 रूपये तथा पदविकाधारक बेरोजगारांना महिन्याकाठी १00 रूपये मानधन देऊन त्यांना शासकीय कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात आले. त्यामुळे दफ्तर दिरंगाईला लगाम बसला आणि प्रशासनही गतीमान झाले. शासन आज ना उद्या आपल्याला पूर्णकालीन नोकरीत सामावून घेईल हा आशावाद या बेरोजगारांच्या मनात होता. तथापि, शासनाची उदासिनता पाहून १९९६-९७ साली कर्मचार्‍यांची राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली. संघटना बळकट होत असल्याचे पाहून, शासनाने या संघटनेचे पंख छाटण्यास प्रारंभ केला. कायमस्वरूपी नोकरीवर अधिकार सांगणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र घेऊन शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांना पहिला धक्का दिला. २00२- 0३ साली तमाम अंशकालीन कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवून, शासनाने अंशकालीन कर्मचारी संकल्पनेचाच गळा घोटला. १९९९ साली अंशकालीन कर्मचारी संघटनेने मंत्रालयावर विशाल मोर्चा काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन हवेतच विरले. २00९ पासून अंशकालीन कर्मचार्‍यांना शासकीय नोकरीत १0 टक्के आरक्षण शासनाने जाहीर केले होते. याशिवाय वयोर्मयादाही शिथिल केली होती. मात्र हा निर्णय लालफितशाहीतच गुंडाळलेला असल्याने अंशकालीन कर्मचार्‍यांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला आहे.** कर्मचार्‍यांचा आकडा १८ हजारांच्या घरातराज्यभरात तब्बल १८ हजार २२६ अंशकालीन कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास ४ हजार कर्मचार्‍यांची नोकरीची वयोर्मयादा उलटली आहे. उर्वरित कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय अद्यापही आशेवर जगून आहेत.