शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

अंशकालीन कर्मचार्‍यांचा ‘पूर्णकालीन’ भ्रमनिरास !

By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST

शासन शब्दाला जागत नाही: दिवसागणिक उलटत चालली वयोर्मयादा

वाशिम : गत २३ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर शासकीय कार्यालयांमध्ये राबणार्‍या अंशकालीन कर्मचार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन वेळोवेळी देणारे शासन शब्दाला जागले नाही. दुसरीकडे, नोकरीची वयोर्मयादा दिवसागणिक उलटत चालली असल्याने हे कर्मचारी दुहेरी विवंचनेत सापडले आहेत. १९९0-९१ साली राज्य शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांची संकल्पना जन्मास घातली. त्यानुसार पदवीधर बेरोजगारास महिन्याकाठी ३00 रूपये तथा पदविकाधारक बेरोजगारांना महिन्याकाठी १00 रूपये मानधन देऊन त्यांना शासकीय कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात आले. त्यामुळे दफ्तर दिरंगाईला लगाम बसला आणि प्रशासनही गतीमान झाले. शासन आज ना उद्या आपल्याला पूर्णकालीन नोकरीत सामावून घेईल हा आशावाद या बेरोजगारांच्या मनात होता. तथापि, शासनाची उदासिनता पाहून १९९६-९७ साली कर्मचार्‍यांची राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली. संघटना बळकट होत असल्याचे पाहून, शासनाने या संघटनेचे पंख छाटण्यास प्रारंभ केला. कायमस्वरूपी नोकरीवर अधिकार सांगणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र घेऊन शासनाने अंशकालीन कर्मचार्‍यांना पहिला धक्का दिला. २00२- 0३ साली तमाम अंशकालीन कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवून, शासनाने अंशकालीन कर्मचारी संकल्पनेचाच गळा घोटला. १९९९ साली अंशकालीन कर्मचारी संघटनेने मंत्रालयावर विशाल मोर्चा काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन हवेतच विरले. २00९ पासून अंशकालीन कर्मचार्‍यांना शासकीय नोकरीत १0 टक्के आरक्षण शासनाने जाहीर केले होते. याशिवाय वयोर्मयादाही शिथिल केली होती. मात्र हा निर्णय लालफितशाहीतच गुंडाळलेला असल्याने अंशकालीन कर्मचार्‍यांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला आहे.** कर्मचार्‍यांचा आकडा १८ हजारांच्या घरातराज्यभरात तब्बल १८ हजार २२६ अंशकालीन कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास ४ हजार कर्मचार्‍यांची नोकरीची वयोर्मयादा उलटली आहे. उर्वरित कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय अद्यापही आशेवर जगून आहेत.