शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परळीतील दगडफेकीची पोलिसांकडून चौकशी

By admin | Updated: June 8, 2014 02:14 IST

दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

गोपीनाथ मुंडेंचे अंत्यसंस्कार : परिस्थितीचे आकलन कमी पडले का?
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या परळीत झालेल्या अंत्यसंस्कारांच्या वेळी शोकाकुल जनसमुदायाच्या तीव्र भावनांची पूर्वकल्पना घेऊन  त्यातून नंतर घडलेल्या घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांची मोठी संख्या व त्यांच्या मुंडेंविषयी असलेल्या तीव्र भावना लक्षात घेता घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना घडू शकतात याची पूर्वकल्पना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना आली होती का व अशा अप्रिय घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली होती का याविषयीचा लेखी अहवाल त्या दिवशी (4 जून) परळीत नेमणुकीवर असलेले पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे, असे राज्य पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’ला सांगितले. हा ‘आयपीएस’ अधिकारी म्हणाला की, त्या दिवशी जे काही घडले त्याची तपशीलवार माहिती देणारा तसेच दगडफेक होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले गेले होते का याचीही नोंद असलेला अहवाल देण्यास तेथे हजर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका:यांना सांगण्यात आले आहे. या अहवालाची शहानिशा करून तो पोलीस महासंचालकांना सादर केला जाईल.
परळीतील त्या दिवशीची परिस्थिती हाताळण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली असे अहवालातून दिसून आले तर, भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.
मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी त्या शोकाकुल अवस्थेतही स्वत: माईक हातात घेऊन कार्यकत्र्याना खुद्द मुंडेंची शपथ घालून शांत केले होते; तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचीही मागणी केली होती.
 
यासंदर्भात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला की, गेल्या काही वर्षात राज्यात अशाच प्रकारे अफाट लोकप्रियता असलेल्या इतरही काही राजकीय नेत्यांचे (विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे) निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळीही असाच लाखोंचा जनसागर लोटला होता. परंतु त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु मुंडे यांचा अचानक झालेला मृत्यू कार्यकत्र्याच्या दृष्टीने धक्कादायक होता व त्याच धक्क्याचे पर्यावसान अंत्यविधीच्या वेळी काही प्रमाणात संतापात झालेले असू शकते.