शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

रेल्वेस्थानकातील पार्किंग असुरक्षितच!

By admin | Updated: November 18, 2014 00:53 IST

नागपूर रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी कुठलीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. अनेक शहरात पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत.

‘सीसीटीव्ही’चा अभाव : रेल्वे प्रशासनाची उदासीनता, अनेकदा मिळाली स्फोटांची धमकीदयानंद पाईकराव - नागपूर नागपूर रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी कुठलीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. अनेक शहरात पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून रेल्वे प्रशासनाकडून पार्किंगच्या कंत्राटदारांना सीसीटीव्ही लावण्याबाबत कुठल्याच सूचना करण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १३५ ते १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्याही ५० हजारावर जाते. रेल्वेस्थानकाच्या पार्किंग परिसरातही असंख्य प्रवासी उभे असतात. अनेकदा रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट घडविण्याचे पत्रही लोहमार्ग पोलिसांना मिळाले आहे. परंतु असे असताना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेप्रति सुरक्षा यंत्रणेत आणि रेल्वे प्रशासनात कमालीची उदासीनता दिसून येते. अनेक शहरात पार्किंगच्या परिसरातील वाहनांमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. परंतु यावरून रेल्वे प्रशासनाने कुठलाच धडा घेतलेला दिसून येत नाही. रेल्वे प्रशासनाकडून पार्किंगचे कंत्राट देताना त्यांना सीसीटीव्ही लावण्याबाबत कुठलीच सक्ती करण्यात येत नसल्याची माहिती आहे. यामुळे कुठल्याही क्षणी काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येणार की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातील दुचाकीच्या पार्किंगचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत. मात्र, पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यासमोरील भागातील पार्किंगमध्ये तसेच लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरील पार्किंगमध्ये सीसीटीव्हीच नसल्यामुळे ही धोक्याची बाब आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सर्वात अधिक प्रवासी पश्चिमेकडील भागातून येतात. त्यामुळे या भागातील पार्किंगवर विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असताना रेल्वे प्रशासनाला मात्र पार्किंगमध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा साधा अंदाजही आला नसल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)