शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

आई-वडिलांना छळणाऱ्या मुलांना काढले घराबाहेर!

By admin | Updated: June 25, 2017 01:05 IST

‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांची जीणे हराम करणाऱ्या पुण्यातील निगडी येथील दोन मुलांना उच्च न्यायालयाने कायद्याचा बडगा दाखवून घराबाहेर काढले आहे.‘एवढेच नव्हे, तर या दोन्ही मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना आॅगस्ट महिन्यापासून निर्वाहासाठी दरमहा प्रत्येकी २,५०० रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला. जबरदस्तीने वडिलांच्या घरात बिऱ्हाडे थाटलेल्या या दोन्ही मुलांनी येत्या दोन आठवड्यांत बायकामुलांसह चंबुगबाळे आवरून जागा खाली केली नाही, तर पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर हुसकावले जावे,’ असेही न्यायालयाने सांगितले.मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर वारसाहक्क न सांगता, म्हातारपणी त्यांचा सांभाळही करावा, या उद्देशाने संसदेने सन २००७ मध्ये केलेल्या ‘मेन्टेनन्स अँड वेल्फेअर आॅफ पॅरेन्ट््स अँड सीनियर सिटिझन्स अ‍ॅक्ट’ या कायद्याच्या आधारे न्या. साधना जाधव यांनी हा आदेश दिला.न्या. जाधव यांनी ज्याचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे केले, ते हे प्रकरण गिरनार बंगला, प्लॉट नं. ५९, सेक्टर २७/ए, प्राधिकरण, निगडी येथे राहणारे सुरेंद्र नरसगोंडा पाटील (८० वर्षे) व त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या कुटुंबाचे आहे. संतोष आणि संदीप या दोन विवाहित मुलांनी सांभाळ करण्याऐवजी पद्धतशीर छळ सुरू केल्याने, या वृद्ध दाम्पत्याने नाईलाजाने उपयुक्त कायद्याचा आधार घेऊन दाद मागितली होती. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आई-वडिलांच्या बाजूने निकाल दिला होता. अपीलात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनीही तो निकाल कायम ठेवला होता. त्याविरुद्ध संतोष याने केलेली रिट याचिका न्या. जाधव यांनी फेटाळली.सुरेंद्र व सुनंदा यांनी स्वअर्जित पैशातून हा बंगला बांधला होता. गेल्या १० वर्षांतील घटनांचा आढावा घेत, न्या. जाधव यांनी निकालपत्रात नमूद केले की, वडील आजारी असताना, संतोषने एका सामंजस्य करारावर (एमओयू) त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यानुसार, त्याने वडील आपल्याला कधीही घरातून बाहेर काढणार नाहीत, असे लिहून घेतले. आपण पहिल्या मजल्यावर राहू व आई-वडिलांनी तळमजल्यावर राहावे, असेही त्याने ठरविले. शिवाय दरमहा त्यांना ठरावीक रक्कम खर्चासाठी देण्याचेही त्याने कबूल केले. प्रत्यक्षात त्याने याचे कधीच पालन केले नाही.या वृद्ध दाम्पत्यास सुजाता नावाची मुलगीही आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. न्या. जाधव यांनी म्हटले की, विवाहानंतर स्वतंत्र जागा घेऊन आपापले संसार करणाऱ्या संतोष व संदीप यांनी, आई-वडील कदाचित घर बहिणीला देऊन टाकतील, या समजापोटी पुन्हा या बंगल्यात येऊन मुक्काम ठोकला. वास्तविक, कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीत मुलांएवढाच मुलींचाही हक्क असताना, या दोन्ही भावांचे हे वर्तन विसंगत आहे.खास करून न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दोन्ही मुलांनी बंगल्याच्या मोकळ््या जागेत छप्पर टाकून, तेथे घरातील सामान रचून ठेवणे आणि सुनेने सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल करणे, या गोष्टींवरून त्यांची आई-वडिलांचा छळ करण्याची मानसिकताच दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले.