शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

परभणीत जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा

By admin | Updated: December 22, 2014 03:13 IST

खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़

परभणी : खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़ प्रत्यक्षात अन्नधान्यामध्ये राज्याला स्वावलंबी बनविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनेशी नाते जोडणाऱ्या पत्रकारितेचीच आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी रविवारी येथे केले़हेमराजजी जैन प्रतिष्ठानच्या वतीने परभणी येथे शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भावे यांना ‘जैन बंधू पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ या वेळी ते बोलत होते़ मंचावर संस्था सचिव हेमराजजी जैन, कवी इंद्रजित भालेराव, प्रतिष्ठानचे सचिव अनिल जैन, प्राचार्य एम़ टी़ मुलगीर यांची प्रमुख उपस्थिती होती़ या वेळी बोलताना भावे म्हणाले, की समाजात ९९ टक्के माणसे चांगली आहेत़ त्याच्या चांगुलपणाचा शोध घेतला पाहिजे़ त्यांना जागा दिली पाहिजे़ परंतु आज सर्वच क्षेत्रांसारखे पत्रकारितेसमोरही विश्वासार्हतेचे आव्हान आहे़ सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आपले सत्व न हरवता पत्रकारांनी करावे, असेही भावे म्हणाले़ प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची भीषण स्थिती आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या चटका लावणाऱ्या आहेत़ आज त्यांना सरकारच्या मदतीबरोबरच समाजाने मानसिक बळ देण्याची गरज असल्याचे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले़ ज्येष्ठ पत्रकार भावे यांचा सन्मान करताना ते म्हणाले, दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीर्घकालीन व तत्काळ मदतीच्या योजना राबविणे आवश्यक आहे़ त्याचवेळी समाजाने संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे़ याच भूमिकेतून सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण व भान ठेवणारी पत्रकारिता मधुकर भावे यांनी रुजवली़ जात, धर्म, प्रांताची अस्मिता टोकदार होत असलेल्या जमान्यात समाज एकसंघ ठेवणारे विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले़ कवी, लेखक, वक्ता, पत्रकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे़़ मुद्रित माध्यमाचे महत्त्व विषद करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, वृत्तवाहिन्या व इंटरनेटच्या जमान्यातही मुद्रित माध्यम, वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे़ घटनेमागील बातमी आणि विश्लेषणासाठी वृत्तपत्र पुढच्या काळातही असणार आहेत़ त्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा, असे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा व पत्रकारांच्या भूमिकेवर भाष्य केले़ प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार हेमराजजी जैन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली़ यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या आॅस्करसाठी निवडलेल्या चित्रपटातील गीतांचे लेखन करणारे कवी इंद्रजित भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला़