शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

परभणीत जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा

By admin | Updated: December 22, 2014 03:13 IST

खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़

परभणी : खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़ प्रत्यक्षात अन्नधान्यामध्ये राज्याला स्वावलंबी बनविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनेशी नाते जोडणाऱ्या पत्रकारितेचीच आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी रविवारी येथे केले़हेमराजजी जैन प्रतिष्ठानच्या वतीने परभणी येथे शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भावे यांना ‘जैन बंधू पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ या वेळी ते बोलत होते़ मंचावर संस्था सचिव हेमराजजी जैन, कवी इंद्रजित भालेराव, प्रतिष्ठानचे सचिव अनिल जैन, प्राचार्य एम़ टी़ मुलगीर यांची प्रमुख उपस्थिती होती़ या वेळी बोलताना भावे म्हणाले, की समाजात ९९ टक्के माणसे चांगली आहेत़ त्याच्या चांगुलपणाचा शोध घेतला पाहिजे़ त्यांना जागा दिली पाहिजे़ परंतु आज सर्वच क्षेत्रांसारखे पत्रकारितेसमोरही विश्वासार्हतेचे आव्हान आहे़ सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आपले सत्व न हरवता पत्रकारांनी करावे, असेही भावे म्हणाले़ प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची भीषण स्थिती आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या चटका लावणाऱ्या आहेत़ आज त्यांना सरकारच्या मदतीबरोबरच समाजाने मानसिक बळ देण्याची गरज असल्याचे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले़ ज्येष्ठ पत्रकार भावे यांचा सन्मान करताना ते म्हणाले, दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीर्घकालीन व तत्काळ मदतीच्या योजना राबविणे आवश्यक आहे़ त्याचवेळी समाजाने संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे़ याच भूमिकेतून सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण व भान ठेवणारी पत्रकारिता मधुकर भावे यांनी रुजवली़ जात, धर्म, प्रांताची अस्मिता टोकदार होत असलेल्या जमान्यात समाज एकसंघ ठेवणारे विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले़ कवी, लेखक, वक्ता, पत्रकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे़़ मुद्रित माध्यमाचे महत्त्व विषद करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, वृत्तवाहिन्या व इंटरनेटच्या जमान्यातही मुद्रित माध्यम, वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे़ घटनेमागील बातमी आणि विश्लेषणासाठी वृत्तपत्र पुढच्या काळातही असणार आहेत़ त्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा, असे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा व पत्रकारांच्या भूमिकेवर भाष्य केले़ प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार हेमराजजी जैन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली़ यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या आॅस्करसाठी निवडलेल्या चित्रपटातील गीतांचे लेखन करणारे कवी इंद्रजित भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला़