शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा

By admin | Updated: December 22, 2014 03:13 IST

खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़

परभणी : खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़ प्रत्यक्षात अन्नधान्यामध्ये राज्याला स्वावलंबी बनविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनेशी नाते जोडणाऱ्या पत्रकारितेचीच आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी रविवारी येथे केले़हेमराजजी जैन प्रतिष्ठानच्या वतीने परभणी येथे शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भावे यांना ‘जैन बंधू पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ या वेळी ते बोलत होते़ मंचावर संस्था सचिव हेमराजजी जैन, कवी इंद्रजित भालेराव, प्रतिष्ठानचे सचिव अनिल जैन, प्राचार्य एम़ टी़ मुलगीर यांची प्रमुख उपस्थिती होती़ या वेळी बोलताना भावे म्हणाले, की समाजात ९९ टक्के माणसे चांगली आहेत़ त्याच्या चांगुलपणाचा शोध घेतला पाहिजे़ त्यांना जागा दिली पाहिजे़ परंतु आज सर्वच क्षेत्रांसारखे पत्रकारितेसमोरही विश्वासार्हतेचे आव्हान आहे़ सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आपले सत्व न हरवता पत्रकारांनी करावे, असेही भावे म्हणाले़ प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची भीषण स्थिती आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या चटका लावणाऱ्या आहेत़ आज त्यांना सरकारच्या मदतीबरोबरच समाजाने मानसिक बळ देण्याची गरज असल्याचे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले़ ज्येष्ठ पत्रकार भावे यांचा सन्मान करताना ते म्हणाले, दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीर्घकालीन व तत्काळ मदतीच्या योजना राबविणे आवश्यक आहे़ त्याचवेळी समाजाने संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे़ याच भूमिकेतून सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण व भान ठेवणारी पत्रकारिता मधुकर भावे यांनी रुजवली़ जात, धर्म, प्रांताची अस्मिता टोकदार होत असलेल्या जमान्यात समाज एकसंघ ठेवणारे विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले़ कवी, लेखक, वक्ता, पत्रकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे़़ मुद्रित माध्यमाचे महत्त्व विषद करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, वृत्तवाहिन्या व इंटरनेटच्या जमान्यातही मुद्रित माध्यम, वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे़ घटनेमागील बातमी आणि विश्लेषणासाठी वृत्तपत्र पुढच्या काळातही असणार आहेत़ त्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा, असे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा व पत्रकारांच्या भूमिकेवर भाष्य केले़ प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार हेमराजजी जैन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली़ यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या आॅस्करसाठी निवडलेल्या चित्रपटातील गीतांचे लेखन करणारे कवी इंद्रजित भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला़