शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

पनवेलचे ‘कलिंगड’राज संपुष्टात

By admin | Updated: May 4, 2017 06:09 IST

सुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज

वैभव गायकर / पनवेलसुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज संपुष्टात आले. महामार्गाच्या रुं दीकरणात या कलिंगड विक्रे त्यांचा बळी गेला आहे. पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर वर्षभर सुरू असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच डबघाईला आला आहे. सुमारे ६० ते ७० कलिंगड विक्रे त्यांचे कुटुंब येथील व्यवसायावर अवलंबून होते. याठिकाणाहून ये-जा करणारे हजारो वाहनचालक आपली तृष्णा भागविण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबत असत. मात्र, येथील कलिंगडाचे राज आता संपुष्टात आले आहे. यापूर्वी जुना मुंबई-पुणे महामार्ग याच ठिकाणाहून जात होता. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर त्याकाळी या विके्र त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. निम्म्यापेक्षा जास्त गाड्या या द्रुतगती महामार्गाने जात असल्याने या विक्रे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला होता. मात्र, कालांतराने पुन्हा एकदा धंद्यावर चांगली वचक बसली. मात्र, कळंबोली ते पळस्पे या मार्गाच्या रुं दीकरणात या व्यावसायिकांचा बळी गेला. तालुक्यातील खुटारी, तळोजा, नितळस आदी ठिकाणचे हे व्यावसायिक आहेत. जवळजवळ ४० वर्षे हा व्यवसाय दिमाखात सुरू होता. कर्नाटक, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील कलिंगड याठिकाणी विक्र ीसाठी ठेवले जात असत. हा व्यवसाय जरी अनधिकृत जागेवर असला तरी याबाबत कोणाचीच तक्र ार नसायची. ये-जा करणाऱ्या वाटसरूंची प्रचंड उकाड्यात तहान भागवणाऱ्या कलिंगडाच्या खापा खाण्याचा मोह याठिकाणाहून जाणाऱ्या कोणालाच आवरता आला नाही, हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळेच याबाबत कोणीच तक्रार केली नाही. सात महिन्यांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत धडक मोहीम राबवत या व्यावसायिकांवर कारवाई केली. या विक्रेत्यांचा व्यवसाय वाचविण्यासाठी काही राजकीय मंडळीही पुढे सरसावली होती. मात्र, आयुक्त शिंदे यांच्यापुढे कोणाचेच चालले नाही. या कारवाईनंतर वर्षानुवर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या विके्र त्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कलिंगड विक्रेत्यांनी घाबरत याठिकाणी व्यवसाय थाटला आहे, तर काही विक्रेते फिरत्या पद्धतीने बैलगाडीच्या साहाय्याने खारघर, कळंबोली, कामोठे आदी ठिकाणी कलिंगड विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या ७०पेक्षा जास्त दुकानदारांच्या शेकडो व्यक्तींवर हा व्यवसाय बंद झाल्याचा परिणाम झाला आहे. आमचे व्यवसाय बंद करण्यापूर्वी प्रशासनाने आमचे या महामार्गावरच कुठेतरी पुनर्वसन करणे गरजेचे होते. हा व्यवसाय केवळ आमच्या फायद्यासाठी नसून ये-जा करणाऱ्या वाटसरूंचीही मोठी पंचाईत झाली आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. - उमेश पाटील, कलिंगड विक्रेता