शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचे ‘कलिंगड’राज संपुष्टात

By admin | Updated: May 4, 2017 06:09 IST

सुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज

वैभव गायकर / पनवेलसुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज संपुष्टात आले. महामार्गाच्या रुं दीकरणात या कलिंगड विक्रे त्यांचा बळी गेला आहे. पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर वर्षभर सुरू असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच डबघाईला आला आहे. सुमारे ६० ते ७० कलिंगड विक्रे त्यांचे कुटुंब येथील व्यवसायावर अवलंबून होते. याठिकाणाहून ये-जा करणारे हजारो वाहनचालक आपली तृष्णा भागविण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबत असत. मात्र, येथील कलिंगडाचे राज आता संपुष्टात आले आहे. यापूर्वी जुना मुंबई-पुणे महामार्ग याच ठिकाणाहून जात होता. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर त्याकाळी या विके्र त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. निम्म्यापेक्षा जास्त गाड्या या द्रुतगती महामार्गाने जात असल्याने या विक्रे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला होता. मात्र, कालांतराने पुन्हा एकदा धंद्यावर चांगली वचक बसली. मात्र, कळंबोली ते पळस्पे या मार्गाच्या रुं दीकरणात या व्यावसायिकांचा बळी गेला. तालुक्यातील खुटारी, तळोजा, नितळस आदी ठिकाणचे हे व्यावसायिक आहेत. जवळजवळ ४० वर्षे हा व्यवसाय दिमाखात सुरू होता. कर्नाटक, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील कलिंगड याठिकाणी विक्र ीसाठी ठेवले जात असत. हा व्यवसाय जरी अनधिकृत जागेवर असला तरी याबाबत कोणाचीच तक्र ार नसायची. ये-जा करणाऱ्या वाटसरूंची प्रचंड उकाड्यात तहान भागवणाऱ्या कलिंगडाच्या खापा खाण्याचा मोह याठिकाणाहून जाणाऱ्या कोणालाच आवरता आला नाही, हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळेच याबाबत कोणीच तक्रार केली नाही. सात महिन्यांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत धडक मोहीम राबवत या व्यावसायिकांवर कारवाई केली. या विक्रेत्यांचा व्यवसाय वाचविण्यासाठी काही राजकीय मंडळीही पुढे सरसावली होती. मात्र, आयुक्त शिंदे यांच्यापुढे कोणाचेच चालले नाही. या कारवाईनंतर वर्षानुवर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या विके्र त्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कलिंगड विक्रेत्यांनी घाबरत याठिकाणी व्यवसाय थाटला आहे, तर काही विक्रेते फिरत्या पद्धतीने बैलगाडीच्या साहाय्याने खारघर, कळंबोली, कामोठे आदी ठिकाणी कलिंगड विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या ७०पेक्षा जास्त दुकानदारांच्या शेकडो व्यक्तींवर हा व्यवसाय बंद झाल्याचा परिणाम झाला आहे. आमचे व्यवसाय बंद करण्यापूर्वी प्रशासनाने आमचे या महामार्गावरच कुठेतरी पुनर्वसन करणे गरजेचे होते. हा व्यवसाय केवळ आमच्या फायद्यासाठी नसून ये-जा करणाऱ्या वाटसरूंचीही मोठी पंचाईत झाली आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. - उमेश पाटील, कलिंगड विक्रेता