शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

पॅन्ट्री, वायफाय आणि बरेच काही...

By admin | Updated: May 16, 2015 03:19 IST

अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे.

मुंबई : अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे. एसटीच्या ताफ्यात दीड कोटी किमतीच्या दोन बसेस दाखल होणार असून, या बसेस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्याचा निर्णय झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बसमध्ये प्रवाशांना प्रवासातच चहा-नाश्त्याची सोय करून देण्यासाठी पॅन्ट्री असणार आहे. तसेच वायफाय आणि अन्य सोयी-सुविधाही बसमध्ये उपलब्ध केल्या जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. एसटी महामंडळाने सध्या आपल्या ताफ्यातील ११0 एसी बसपैकी ७0 बस नादुरुस्ती आणि सातत्याने होणारे बिघाड यामुळे त्या बाजूला काढण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी ३५ स्वत:च्या मालकीच्या आणि ३५ भाड्यावर एसी बस घेतल्या जाणार होत्या. मात्र हा प्रस्ताव बाजूला ठेवत ७0 बसेस स्वत:च्या मालकीच्या घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३५ व्होल्वो आणि ३५ स्कॅनिया कंपनीच्या बस विकत घेतल्या. यातील १० बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, १५ बस महिनाभरात येतील. तर उर्वरित बस येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या ताफ्यात तब्बल दीड कोटी किमतीच्या दोन स्कॅनिया कंपनीच्या बस असून, त्या मुंबई एअरपोर्ट ते पुणे या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने या मार्गावरून खासगी टॅक्सी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक सर्व्हे केला. या मार्गावरून खासगी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता यातील तब्बल ६0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी एसटीकडे खेचण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. त्यासाठी दीड कोटीच्या बस चालविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. खासगी टॅक्सीचे भाडे हे जवळपास १000 ते १२00पेक्षा अधिक असते. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाडे जवळपास एक हजार रुपये ठेवण्याचा विचार करीत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजख खंदारे यांनी सांगितले. या बसमध्ये प्रवाशांना चहा, कॉफी, नाश्ता, पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक पॅन्ट्रीही उपलब्ध केली जाणार आहे. ही सेवा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक आसनाच्या मागे एक टीव्हीदेखील बसविण्यात येणार असून, वायफायसारखी सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे खंदारे म्हणाले.