शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पानसरे हत्या प्रकरण; मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 15:14 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे.

कोल्हापूर, दि. 2- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता. गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला असून, फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला राज्य सरकारने १० लाखांचे बक्षीस जाहीर केलं असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा यांनीही या दोघांचे फोटो ओळखले आहेत. याशिवाय एका साक्षीदारानेही पवार आणि अकोलकर पिस्तूल मिळवण्यासाठी बिंदू चौकातील दुकानात आल्याची साक्ष पोलिसांकडे दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड याच्याशी या दोघांचाही संपर्क आल्याचे तपासात समोर आलं आहे. मात्र, पानसरे यांची हत्या झाल्यापासून हे दोघीही फरार आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं आहे. तरीही ते पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड आणि विरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांवर विशेष तपास यंत्रणेनं दोषारोप दाखल केलं आहे. यापैकी विरेंद्र तावडे दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवाडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. 

फेब्रुवारी 2015 मध्ये झाली पानसरेंची हत्याकॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकऱ्यांनी 16  फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.