शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी

By admin | Updated: April 20, 2016 01:01 IST

दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत

पुणे : दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले़ मराठवाड्यात दुष्काळ असताना औरंगाबाद येथील दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली जात आहे़ त्यावर असा पाणीपुरवठा बंद करणे चुकीचे असल्याचे जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते़ सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप होत असल्याचे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘सरकार ही सामूहिक काम असून, मुख्यमंत्री त्याचे नेतृत्व करतात़ आम्हाला जबाबदारीचे भान आहे़ पाणी नियोजन, रोजगार हमी योजना, मजुरांना काम याच्या अंमलबजावणीत कमी पडतो़ काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण सरकारला निशाणा करीत आहेत़ त्यावर सर्व पक्षीय समित्या नेमून अंमलबजावणी अधिक गतीने करता येईल़ या विषयावर पंकजा मुंडे यांच्याशी आमचे मतभेद आहेत़ स्वतंत्र विदर्भाबाबत त्या म्हणाल्या, विदर्भात १०६ आमदार तसेच मुख्यमंत्र्यासह अनेक पदे मिळूनही विकास झाला नाही़ आम्हाला १० वर्षे संधी दिली असती तर विकास करून दाखविला असता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली होती़ १५ वर्षांत अनेक सिंचन प्रकल्प रखडले़, २०१२ ला पूर्ण होणारे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे अनुशेष वाढला़ महाराष्ट्र अखंड राहावा, अशी आमची भूमिका आहे़ छोट्या राज्याची भूमिका मांडणाऱ्यांनी गुजरात छोटा करून दाखवावा़ काही जणांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत़ त्यांना विकासातला मोठा भागीदार पुसून टाकायचा आहे, असे त्यांनी सांगितले़ विधिमंडळ अधिवेशनात आपण महाराष्ट्र अखंड व संयुक्त असावा, यासाठी विधान परिषद नियमानुसारचा २३ब ऐतिहासिक प्रस्ताव सादर करून शिवसेनेने मराठी जनतेशी आपली इमानदारी स्पष्ट केली़ हा प्रस्ताव आता पुढील अधिवेशनात येणार आहे़ या अधिवेशनात पुणे शहराच्या वाहतूक, कचरा, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, वीज ग्राहकांची फसवणूक, मुद्दाम उशिरा बिले देऊन केली जाते, त्याबद्दल कंत्राटदारांवर कारवाई, मुलांच्या शालेय सहलींबाबत घेण्याच्या दक्षताबाबत विधायक सूचना शासनाने स्वीकारावी, या मुद्द्यांवर प्रश्न, लक्षवेधीद्वारे आवाज उठवला़ पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे काम वीज, फर्निचरअभावी रखडले होते़ त्यासाठी आर्थिक तरतूद करून यासाठी पाऊले उचलणार असल्याचे ठोस आश्वासन विधी व न्याय विभागाने सभागृहात दिल्याचे डॉ़ गोऱ्हे यांनी सांगितले़