शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पन्हाळगड ते विशालगड भ्रमंती एका दिवसात फत्ते

By admin | Updated: July 11, 2017 02:41 IST

पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पन्हाळगड ते विशालगड या ऐतिहासिक वाटेवर ७४ शिवप्रेमींनी सलग पदभ्रमंती करत हा अवघड ट्रेक एका दिवसात पूर्ण केला आहे. जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या ट्रेकमध्ये पावनखिंडीतील महापराक्रमाला श्रद्धांजली वाहण्यात आली.या मोहिमेबाबत ट्रेकर चंद्रकांत साटम यांनी सांगितले की, १२ जुलै १६६० रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले होते. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळच्या सुमारास महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले. या समर प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि ज्ञात व अज्ञात मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले होते. त्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून या ट्रेकचे आयोजन करत आहे. या भ्रमंतीदरम्यान मूळ इतिहासाला उजाळा दिला जातो. या वर्षी या वाटेवर ११ ते ५८ वयोगटातील तब्बल ७४ शिवप्रेमींनी एकदिवसीय पदभ्रमण केले. महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेत महाराष्ट्रासह हैदराबाद आणि दिल्ली या शहरांतील दुर्गप्रेमींनीही सहभाग घेतला होता. मोहिमेतील वैशिष्ट्य म्हणजे इतिहास जागवत सर्व दुर्गप्रेमी सलग २२ तास चालत राहिले. त्यामुळे दुर्गप्रेमींच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची चाचणी करणारी ही पदभ्रमण मोहीम होती.छोट्या मावळ्यांनी लक्ष वेधले : एकूण ७४ दुर्गप्रेमींमध्ये याना कोकणे (११ वर्षे) आणि पालवी चव्हाण (१० वर्षे) या चिमुरडींनी ४० किमी अंतर गाठून पांढर पाणीपर्यंत पदभ्रमण केले. तर जिजाई कोकणे (१६ वर्षे) या तरुणीने पन्हाळगड ते विशाळगड हे अवघड अंतर सलग पदभ्रमण करत पूर्ण केले. ७४ दुर्गप्रेमींपैकी तब्बल ४१ सदस्यांनी संपूर्ण मोहीम फत्ते केली.अवघ्या १९ तासांत पूर्ण केली मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी हा ट्रेक अवघ्या १९ तासांत पूर्ण केला. रघुवीर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेत सामील होत आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने ट्रेक पूर्ण करणे कठीण होते. अखेरच्या टप्प्यात वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे उत्साहात भर पडल्याने शेवटचे १६ किलोमीटर अंतर अवघ्या अडीच तासांत पार केले. अधिकाधिक युवा वर्गाने या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.