शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पांडुरंगा... महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे!

By admin | Updated: July 16, 2016 08:02 IST

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता याच्यासह विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता यांना मिळाला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, देव गुज सांगतसे‘ या कळकळीच्या आळवणीला प्रतिसाद देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढीची वारी पूर्ण केली. ‘वारी चुकू न दे हरी हीच’ आस मनी ठेवत दर्शन होताच धन्य पावलेल्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. येथे आलेल्या विविध संतांच्या पालख्या नगर प्रदक्षणेसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे प्रदक्षणा मार्गावरअखंड टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. चंद्रभागेकाठी वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. पाद्यदर्शन, मुख दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. मुख्य दर्शन बारी गोपाळपूरपर्यंत गेली होती. कळसाचे दर्शन घेण्यासाठी चौफाळा येथे भाविकांची दाटी झाली होती. पुंडलिकाचे दर्शन घेऊन भाविकांना नामदेव पायरीजवळ दर्शन घेण्यासाठी महाद्वारात येण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटींग केल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. कळसाचेही व्यवस्थित दर्शन घेता आले. तब्बल ७० हजार भाविकांनी पांडुरंगाचे पददर्शन घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. (प्रतिनिधी)आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व सुनिता फुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.ज्यांच्यावर देव प्रसन्न होतो, त्यांनाच महापूजेची संधी मिळते. माझे आई- वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील कायम वारीला जायचे. माझी पत्नी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वारीला जात होती. मी सेवानिवृत्त होऊन चार वर्षे झाली.राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार बसची सोय केल्याने वेळ नसलेल्या वारकऱ्यांनी एक दिवसाची वारी पोच केली. नियमित वारकरी द्वादशीचा उपवास सोडल्याशिवाय पंढरपूर सोडत नसल्याने आज केवळ एक दिवसाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.