शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगा... महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे!

By admin | Updated: July 16, 2016 08:02 IST

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता याच्यासह विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता यांना मिळाला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, देव गुज सांगतसे‘ या कळकळीच्या आळवणीला प्रतिसाद देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढीची वारी पूर्ण केली. ‘वारी चुकू न दे हरी हीच’ आस मनी ठेवत दर्शन होताच धन्य पावलेल्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. येथे आलेल्या विविध संतांच्या पालख्या नगर प्रदक्षणेसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे प्रदक्षणा मार्गावरअखंड टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. चंद्रभागेकाठी वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. पाद्यदर्शन, मुख दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. मुख्य दर्शन बारी गोपाळपूरपर्यंत गेली होती. कळसाचे दर्शन घेण्यासाठी चौफाळा येथे भाविकांची दाटी झाली होती. पुंडलिकाचे दर्शन घेऊन भाविकांना नामदेव पायरीजवळ दर्शन घेण्यासाठी महाद्वारात येण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटींग केल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. कळसाचेही व्यवस्थित दर्शन घेता आले. तब्बल ७० हजार भाविकांनी पांडुरंगाचे पददर्शन घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. (प्रतिनिधी)आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व सुनिता फुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.ज्यांच्यावर देव प्रसन्न होतो, त्यांनाच महापूजेची संधी मिळते. माझे आई- वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील कायम वारीला जायचे. माझी पत्नी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वारीला जात होती. मी सेवानिवृत्त होऊन चार वर्षे झाली.राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार बसची सोय केल्याने वेळ नसलेल्या वारकऱ्यांनी एक दिवसाची वारी पोच केली. नियमित वारकरी द्वादशीचा उपवास सोडल्याशिवाय पंढरपूर सोडत नसल्याने आज केवळ एक दिवसाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.