शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पांडुरंगा... महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे!

By admin | Updated: July 16, 2016 08:02 IST

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता याच्यासह विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता यांना मिळाला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, देव गुज सांगतसे‘ या कळकळीच्या आळवणीला प्रतिसाद देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढीची वारी पूर्ण केली. ‘वारी चुकू न दे हरी हीच’ आस मनी ठेवत दर्शन होताच धन्य पावलेल्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. येथे आलेल्या विविध संतांच्या पालख्या नगर प्रदक्षणेसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे प्रदक्षणा मार्गावरअखंड टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. चंद्रभागेकाठी वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. पाद्यदर्शन, मुख दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. मुख्य दर्शन बारी गोपाळपूरपर्यंत गेली होती. कळसाचे दर्शन घेण्यासाठी चौफाळा येथे भाविकांची दाटी झाली होती. पुंडलिकाचे दर्शन घेऊन भाविकांना नामदेव पायरीजवळ दर्शन घेण्यासाठी महाद्वारात येण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटींग केल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. कळसाचेही व्यवस्थित दर्शन घेता आले. तब्बल ७० हजार भाविकांनी पांडुरंगाचे पददर्शन घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. (प्रतिनिधी)आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व सुनिता फुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.ज्यांच्यावर देव प्रसन्न होतो, त्यांनाच महापूजेची संधी मिळते. माझे आई- वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील कायम वारीला जायचे. माझी पत्नी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वारीला जात होती. मी सेवानिवृत्त होऊन चार वर्षे झाली.राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार बसची सोय केल्याने वेळ नसलेल्या वारकऱ्यांनी एक दिवसाची वारी पोच केली. नियमित वारकरी द्वादशीचा उपवास सोडल्याशिवाय पंढरपूर सोडत नसल्याने आज केवळ एक दिवसाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.