शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पांडुरंगा... महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे!

By admin | Updated: July 16, 2016 08:02 IST

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता याच्यासह विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता यांना मिळाला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, देव गुज सांगतसे‘ या कळकळीच्या आळवणीला प्रतिसाद देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढीची वारी पूर्ण केली. ‘वारी चुकू न दे हरी हीच’ आस मनी ठेवत दर्शन होताच धन्य पावलेल्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. येथे आलेल्या विविध संतांच्या पालख्या नगर प्रदक्षणेसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे प्रदक्षणा मार्गावरअखंड टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. चंद्रभागेकाठी वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. पाद्यदर्शन, मुख दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. मुख्य दर्शन बारी गोपाळपूरपर्यंत गेली होती. कळसाचे दर्शन घेण्यासाठी चौफाळा येथे भाविकांची दाटी झाली होती. पुंडलिकाचे दर्शन घेऊन भाविकांना नामदेव पायरीजवळ दर्शन घेण्यासाठी महाद्वारात येण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटींग केल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. कळसाचेही व्यवस्थित दर्शन घेता आले. तब्बल ७० हजार भाविकांनी पांडुरंगाचे पददर्शन घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. (प्रतिनिधी)आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व सुनिता फुंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.ज्यांच्यावर देव प्रसन्न होतो, त्यांनाच महापूजेची संधी मिळते. माझे आई- वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. वडील कायम वारीला जायचे. माझी पत्नी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वारीला जात होती. मी सेवानिवृत्त होऊन चार वर्षे झाली.राज्य परिवहन महामंडळाने तीन हजार बसची सोय केल्याने वेळ नसलेल्या वारकऱ्यांनी एक दिवसाची वारी पोच केली. नियमित वारकरी द्वादशीचा उपवास सोडल्याशिवाय पंढरपूर सोडत नसल्याने आज केवळ एक दिवसाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.