शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

पंचनामा - शब्द बापुडे केवळ वारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 01:42 IST

बऱ्याच वर्षांपूर्वी मराठीतील एक वग खूप गाजला होता. गोपीनाथ सावकार यांनी तो रंगमंचावर आणला होता

संजीव साबडेबऱ्याच वर्षांपूर्वी मराठीतील एक वग खूप गाजला होता. गोपीनाथ सावकार यांनी तो रंगमंचावर आणला होता आणि अभिनेते अशोक सराफ यांची नाटक, चित्रपट यांतील एंट्री त्या वगातूनच झाली होती. त्या वगाचं नाव होतं, ‘बोलायचंच तर कमी का?’ सध्या राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची जी भाषणं होत आहेत, ती पाहता, बोलायचंच, तर कमी का? या वगनाट्याची आठवण होते. सारेच नेते भसाभस बोलत सुटले आहेत. तोंडाला येईल ते, त्या क्षणी आठवेल ते बोलत सुटले आहेत आपले नेते. ‘शब्दवीर, वाचावीर ऐसे पुढारी थोर थोर...’ या ओळींची आठवण होते. मुख्यमंत्र्यांची मुंबईभर भलीमोठी होर्डिंग्ज लागली आहेत. त्यावर त्यांचं छायाचित्र, प्रत्येकावर एक आश्वासन आणि आणि त्याखाली हे आपण नक्की पूर्ण करणार, हे स्पष्ट होण्यासाठी ‘हा माझा शब्द’ असंही लिहिलंय. दुसरीकडे शिवसेनेच्या होर्डिंग्जवर उद्धव ठाकरे ‘नुसत्या शब्दांनी मुंबईचा विकास कसा होईल,’ असा सवाल विचारताना दिसत आहेत.पण शब्दांचा भडिमार सभांतूनही सुरू आहे. आधी निवडणूक जाहीरनामा असायचा. मग वचननामा हा शब्द आला, मग वचकनामा आला. आता तर भाजपाने स्टॅम्पपेपरवरच आश्वासनांची खैरात वाटली आहे. जाहीरनामा, वचननामा, वचकनामा हे सारे नुसते शब्दांचे फुगे, तसंच स्टॅम्पपेपरचं. असा स्टॅम्पपेपर कुठंच चालणार नाही. पण सारी स्थिती शब्द बापुडे केवळ वारा या मर्ढेकरांच्या कवितेप्रमाणे. या कानानं ऐकायचे आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे, याची राज्यातल्या मतदारांना सवयच झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत शब्दांचे बुडबुडे फारच मोठे आहेत. मुंबईत नरिमन पॉइंट ते बोरीवली हे अंतर २0 मिनिटांत पूर्ण होईल, असं मेट्रो आश्वासन मुख्यमंत्री देताहेत, तर स्वत:चं धरण बांधणारी मुंबई महापालिका पहिली असं उद्धव ठाकरे सांगताहेत. वैतरणेवर मोडकसागर धरण बांधलं, तेव्हा उद्धव ठाकरे जन्मलेही नव्हते. पण त्यांचंही ते श्रेय घ्यायला उठले आहेत. यंदा महापालिका निवडणुकांत लढाई उमेदवारांची दिसतच नाही. फडणवीस विरुद्ध ठाकरे विरुद्ध ठाकरे असेच शब्दबंबाळ वातावरण आहे. नाही म्हणायला नितीन गडकरी, मनोज तिवारी, सुप्रिया सुळे, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्य शिंदे असे पाहुणे कलाकार डायलॉग मारून जातात. पण शब्दांच्या फटाक्यांची आतशबाजी करण्याचं सारं काम फडणवीस आणि ठाकरे बंधूंनीच हाती घेतलंय. पूर्वी झोपडपट्टीला पाणी पुरवू, आतमध्ये पक्के रस्ते बांधू, रेशन कार्ड मिळवून देईन, एरियातला कचरा साफ करू अशी छोटी आश्वासनं असत आणि पालिका तसंच जिल्हा परिषद मतदारसंघात तेवढी पुरेशी वाटत. पण आता फारच मोठ्या उड्या सुरू आहेत. पारदर्शक कारभार, भले मोठे रस्ते, भ्रष्टाचारमुक्त शहर, चोवीस तास पाणी, चांगले रस्ते नसल्यास पथकर नाही, असं मुख्यमंत्री सांगताहेत. ठाकरे केलेल्या, न केलेल्या कामांची जंत्री आपल्या नावावर जमा करताहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र त्या दोघांना खोटं खोटं नाटक म्हणून डिवचताहेत, असे शब्दांचे खेळ. निवडणुकांनंतर हेच सारे गळ्यात गळे घालून दिसतील. तोपर्यंत त्यांचे ‘बोलायचंच, तर कमी का?’ अशा वगनाट्याप्रमाणे चाललंय. आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें, शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन शब्दें वांटूं धन जनलोकां तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्द चि गौरव पूजा करूं असं संत तुकारामांनी लिहिलंय. शब्दांची शस्त्रे जोरात पारजणं सुरू आहे. शब्दांचे धन जनलोका वाटू असंही ते म्हणतात. ते अगदी खरंय. केवळ मतदारांना शब्दांचं धन वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकदा निवडून आल्यावर धन भलतीकडे जातं आणि शब्द तर त्यांच्याही आठवणीत राहात नाहीत.