शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

‘जीवनदायी’तून शेतकरी बाहेरच !

By admin | Updated: March 26, 2016 02:07 IST

राजीव गांधी जीवनदायी योजनेत जास्तीतजास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आठ महिने लोटले; तरीही आदेश काही निघत नाहीत.

- यदु जोशी,  मुंबईराजीव गांधी जीवनदायी योजनेत जास्तीतजास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आठ महिने लोटले; तरीही आदेश काही निघत नाहीत. तांत्रिक घोळ कायम असल्याने लाखो शेतकरी या योजनेपासून वंचितच आहेत. दरम्यान, या योजनेचा गैरवापर केल्याबद्दल १००हून अधिक इस्पितळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या योजनेत ९७१ प्रकारच्या आजारांवरील उपचारांची सोय आहे. जे शेतकरी दारिद्र्यरेषेखाली मोडतात तेच नियमानुसार योजनेचे लाभार्थी ठरतात, पण आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील सहा जिल्हे, असे एकूण १४ जिल्हे भीषण दुष्काळाचा सामना करीत असून, त्याची झळ जवळपास सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा असताना अचानक आरोग्यावर खर्च करण्याची पाळी आली तर काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. किमान या १४ जिल्ह्यांबाबत तरी तांत्रिक घोडे नाचवू नये, अशी भावना आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेण्याबरोबरच योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारंवार व्यक्त केलेला असतानाही निर्णयाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. आघाडी सरकारने जीवनदायी योजनेबाबत नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी करार केला होता. त्यात दारिद्र्यरेषेवरील शेतकऱ्यांचा समावेश नव्हता. आता तो करायचा असेल तर इन्शुरन्स कंपनीकडे जादा प्रीमियम सरकारला भरावा लागेल. ११ नोव्हेंबरला हा करार संपणार आहे. नवीन करारामध्ये कायमस्वरूपी तरतूद करावी लागणार आहे. या योेजनेंतर्गत राज्यातील ४९१ इस्पितळांना संलग्नता देण्यात आली आहे. काही इस्पितळांनी कमाईवर डोळा ठेवून नियमबाह्य उपचार या योजनेत केले आणि पैसा मिळविला. किमान १००हून अधिक इस्पितळांना या योजनेचे संचालन करणाऱ्या राजीव गांधी सोसायटीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.नेमकी माहिती द्या...जीवनदायी योजनेत शेतकऱ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने किती पिवळे, केशरी आणि पांढरे शिधापत्रिकाधारक आहेत याची नेमकी माहिती द्या, अशी विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाने दोनवेळा अन्न व नागरी पुरवठा विभागाला केली; पण अद्याप माहिती मिळालेली नसल्याचा तक्रारीचा सूर आरोग्य विभागाच्या सूत्रांनी लावला.योजना प्रमुखांविनाचराजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष सिंह (आयएएस अधिकारी) यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. योजनेची सूत्रे सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वारभुवन यांच्याकडे आहेत. त्यांचीही लवकरच पदोन्नतीने बदली होणार असल्याची माहिती आहे.किमान आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पांढऱ्या शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायी योजनेचा लाभ द्यावा, असा प्रस्ताव आपल्या विभागाने दिला आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे.- डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री

जीवनदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. ही भावना मी सरकारच्या कानावर घातली आहे. या भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या तांत्रिक व्याख्येत अडकवून वंचित ठेवण्याची ही वेळ नाही. - किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन