शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य नियुक्त्या; शिक्षणक्षेत्रात घोटाळा

By admin | Updated: January 6, 2016 00:16 IST

चौकशी समिती नियुक्त : उच्चशिक्षण सहसंचालकांकडून धक्कादायक माहिती : २१२ प्राध्यापक, १९६ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

संतोष मिठारी, कोल्हापूर : नियमबाह्य नियुक्ती प्रक्रिया राबविल्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अनुदानित महाविद्यालयांतील ४०८ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने संबंधितांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला आहे. निकष, नियमांनुसार नियुक्ती नसतानादेखील संबंधित कर्मचाऱ्यांना गेल्या २० ते ३० वर्षांपासून शासनाकडून वेतन अदा होत आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयाने एचटीई सेवार्थ प्रणालीसाठी संकलित केलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन करण्यासाठी कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने विविध माहिती संकलनासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हानिहाय शिबिरे घेतली. या प्रणालीसाठी संबंधित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद, त्यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रांची सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली. त्यात १३३ अनुदानित महाविद्यालयांतील एकूण ४०८ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत चुका, नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले आहे. त्यात २१२ प्राध्यापक आणि १९६ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निकष, नियमांनुसार नियुक्ती झालेली नसतानादेखील गेल्या २० ते ३० वर्षांपासून संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन अदा झाले आहे. संबंधितांच्या वेतनापोटी अनुदानाच्या माध्यमातून आतापर्यंत शासनाच्या कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचे दिसून येते. अशा स्वरूपातील अनियमित नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने उच्च व तंत्रशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी कोल्हापूर विभागातील संबंधित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणनिहाय माहिती सादर केली आहे. नियमाबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने नियुक्त झालेल्यांची नोकरी धोक्यात आली आहे.अनुदानाची वसुली, नोकरी जाणारया प्रकरणावर पुढील कार्यवाही पुण्यातील समिती घेणार आहे. समितीसमोर महाविद्यालयांना कोल्हापूर विभागीय सहसंचालकांनी नोंदविलेल्या आक्षेपांबाबत निराकारण करता येणार आहे. त्यातून नियुक्तीबाबत काही आक्षेप अथवा नियमबाह्य प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित महाविद्यालयांना या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी देण्यात आलेल्या अनुदानाची वसुली केली जाईल, शिवाय संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांना नोकरीतून मुक्त केले जाईल.संस्थांच्या नियमबाह्य कारभाराचा फटकाविद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांकडून त्यांच्या पातळीवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर त्यांची पदमान्यता करण्यासाठी शिक्षण सहसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपर्यंत घडले आहेत. नियुक्ती केलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असल्याचे भावनिक मुद्दा करून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा काही महाविद्यालये, संस्थांनी केलेल्या नियमबाह्य कारभाराचा फटका या ४०८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला असून, त्यांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे.माझ्या कार्यालयाने केलेल्या तपासणीत शासन नियमांच्या अनुपालनाला बगल देऊन अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे वास्तव समोर आले. शासनाच्या सूचनेनुसार ही तपासणी केली. त्यात निकष, नियमांनुसार नियुक्ती नसलेले ४०८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी दिसून आले आहेत. त्यांच्याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठीचा प्रस्ताव पुणे कार्यालयातील समितीकडे सादर केला आहे. आमच्यासमोर आलेले वास्तव पारदर्शकपणे समितीसमोर मांडले आहे. याबाबत समिती निर्णय घेईल.- डॉ. अजय साळी, उच्चशिक्षण सहसंचालक, कोल्हापूर विभाग