शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

अन्यथा पालिकेवर प्रशासक नेमू

By admin | Updated: March 22, 2017 02:45 IST

नागरिकांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीसारख्या सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमू, अशी तंबी मंगळवारी उच्च न्यायालयाने महापालिकेला दिली.

मुंबई : नागरिकांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीसारख्या सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमू, अशी तंबी मंगळवारी उच्च न्यायालयाने महापालिकेला दिली. प्रस्तावित विकास आराखड्यात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा राखीव ठेवण्याची हमी देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले. वांद्रे व खार परिसरात सुन्नी मुस्लिमांसाठी दफनभूमी बांधण्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात भूखंड राखीव ठेवावा, यासाठी मोहम्मद अली कुरेशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबईची लोकसंख्या किती आहे व किती स्मशानभूमी, दफनभूमी आवश्यक आहेत? तसेच एच वॉर्डमध्ये (वांद्रे) किती दफनभूमी आहेत? अशी विचारणा महापालिकेकडे केली होती. या निर्देशानुसार महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘मुंबईची लोकसंख्या एक कोटी २७ लाख ९० हजार आहे. स्मशानभूमी व दफनभूमीसाठी मुंबईत ३८.३६ हेक्टर जागा आवश्यक आहे. तर एच वॉर्डमध्ये एक हेक्टरपेक्षा कमी भूखंड दफनभूमीसाठी आवश्यक आहे. मात्र एच वॉर्डमध्ये आधीच मुस्लीम समाजाच्या वेगवेगळ्या पंथांसाठी पाच दफनभूमी उपलब्ध असल्याने आणखी दफनभूमीची आवश्यकता नाही. कोणताही समाज स्मशनभूमी किंवा दफनभूमीसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी महापालिकेला भाग पाडू शकत नाही,’ असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यावर याचिकाकर्त्यांचे वकील अश्रफ शेख यांनी आक्षेप घेतला. ‘एच वॉर्डमधील सर्व दफनभूमी खासगी आहेत. महापालिकेच्या धोरणाप्रमाणे महापालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये चार हेक्टर जागा स्मशानभूमी व दफनभूमीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे,’ अशी माहिती शेख यांनी खंडपीठाला दिली. यावर खंडपीठाने महापालिका दिशाभूल करत असल्याचे म्हटले. ‘महापालिकेने नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिकेचे हे कर्तव्य आहे. जर तुम्हाला नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देता येत नसेल तर आम्ही महापालिकेवर प्रशासक नेमू,’ अशी तंबी खंडपीठाने महापालिकेला दिली.स्मशानभूमी, दफनभूमीसाठी असलेल्या जागांवर तुम्ही (महापालिका) मॉल, इमारती बांधाल. पण त्याच इमारतींमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय? ते बाजूलाच असलेल्या समुद्रात फेकून देणार का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावले. यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रस्तावित विकास आराखड्यात एच वॉर्डमध्ये दफनभूमीसाठी ३००० चौ. मी. भूखंड राखीव ठेवू, असे सांगितले. मात्र खंडपीठाने केवळ आश्वासन देऊ नका, असे म्हणत महापालिकेला यासंदर्भात दोन आठवड्यांत हमी देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)